चंद्रभागेतील साठलेल्या पाण्यात हजारो भाविकांचे स्नान संसर्गाचा धोका : नगरपरिषदेकडून संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी नाहीच
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:34+5:302015-07-10T23:13:34+5:30
१०पंड०९,१०

चंद्रभागेतील साठलेल्या पाण्यात हजारो भाविकांचे स्नान संसर्गाचा धोका : नगरपरिषदेकडून संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी नाहीच
१ पंड०९,१०चंद्रभागेच्या पात्रातील सखल भागात थांबलेले पाणी, शेजारी प्रचंड गलिच्छ कचरा आणि त्याशेजारीच स्नान करणारे भाविक दिसत आहेत.पंढरपूर : चंद्रभागा नदीपात्रातील सखल भागात केवळ गुडघाभर पाणी आहे तरी दररोज शेकडो भाविक त्या डबक्यांमध्ये स्नान करत असल्याने भाविकांना त्वचारोगाच्या संसर्गाची भीती निर्माण झाली आहे.अधिक मासानिमित्त पंढरपुरात दररोज हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. दोन दिवस थांबून येथे भजन-कीर्तन करुन चंद्रभागेत स्नान करण्यासाठी ते नदीवर मोठ्या आशेने येतात, मात्र नदीत पाणीच नसल्याने नदीपात्रात जिथे कुठे साठलेले पाणी आहे त्याच पाण्यात स्नान करून परंपरा जपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याच पाण्यात आंघोळ करून पुन्हा त्याच पाण्यात कपडे धुवायचे वाळवंटात वाळवायचे असा प्रकार चालतो. अनेक वेळा हे कपडे तसेच वाळवंटात टाकून दिले जातात, त्यामुळे ते कपडे पाण्यात व चिखलात पडून कुजतात आणि त्याचीच सर्वाधिक घाण चंद्रभागेत साठून राहिलेली दिसते. विशेषत: पुंडलिक मंदिराच्या समोरच्या बाजूला अशा कुजलेल्या कपड्यांचा खच पडलेला दिसतो. शिवाय चंद्रभागेच्या पाण्याची पूजा करण्यासाठी हळद-कुंकवासह दिवे सोडून पूजा करण्यात येते. त्यामुळे पूजेतील निर्माल्याचाही मोठा खच साचून नदीपात्राला अक्षरश: डबक्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे डास व चिलटांचे प्रमाण वाढले आहे.---कोट :::::::::::::::::::::::भाविकांनी पाण्यात आंघोळ करू नये, असे आवाहन केले आहे तरी देखील भाविकांची श्रध्दा लक्षात घेऊन पंढरपूर शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या बंधार्यातून दोन दिवसांपूर्वी पॉईंट पंधरा सेंटिमीटर इतके पाणी सोडले आहे. त्यामुळे तितके पाणी तरी किमान वाहते झाले आहे. मात्र तरी देखील या पाण्यातून त्वचा रोगाचा धोका संभवतो हे सत्य असल्याने भाविकांनी उजनीतून पाणी येईपर्यंत या साठलेल्या पाण्यात स्नान करु नये.-शंकर गोरे,मुख्याधिकारी,पंढरपूर, नगरपरिषद, पंढरपूर