शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

"ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 10:44 IST

उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमधल्या एका भाजपा आमदारानं वादग्रस्त विधान केलं आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमधल्या एका भाजपा आमदारानं वादग्रस्त विधान केलंभारतात ज्या लोकांना असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजेभाजपाचे मुजफ्फरनगरमधले आमदार विक्रम सैनी यांनी उधळली मुक्ताफळे

लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमधल्या एका भाजपा आमदारानं वादग्रस्त विधान केलं आहे. भारतात ज्या लोकांना असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे, अशी मुक्ताफळे भाजपाचे मुजफ्फरनगरमधले आमदार विक्रम सैनी यांनी उधळली आहेत. परंतु हे माझं वैयक्तिक मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सैनी म्हणाले, मला व्यक्तिगतरीत्या वाटतं की, जे लोक सांगतात भारतात भीती वाटते किंवा ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे.माझ्याकडे एखादं मंत्रालय दिल्यास अशा सर्वच माणसांना मी बॉम्बनं उडवून देईन. कोणालाही सोडणार नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेते नसिरुद्दीन शाह म्हणाले होते की, देशातील मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. बुलंदशहरमध्ये कथित गोहत्येच्या प्रकरणात हिसेंमध्ये पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणावरून मोठं वादंग निर्माण झालं होतं.  मी पण देशभक्त आहे. पण मला गोंधळ घालण्याची गरज वाटत नाही, असं शहांनी म्हटलं होतं.नसिरुद्दीन शहा यांच्या विधानानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यामुळे त्यांना अजमेर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेता आला नव्हता. त्यावेळी नसिरुद्दीन म्हणाले होते, मे देशद्रोही नाही. देशावर टीका करताना मला दु:ख होतं. मात्र चुकीचं वाटल्यास त्यावर मी अवश्य बोलणार. मला देशाच्या भविष्याची चिंता वाटते. माझ्या 4 पिढ्या या देशात जन्मल्या. माझा जन्मदेखील याच देशात झाला. माझी मुलंदेखील इथंच राहणार आहेत. माझं देशावर खूप प्रेम आहे. मात्र त्यासाठी मला गोंधळ घालण्याची आवश्यकता वाटत नाही,' असं नसिरुद्दीन यांनी म्हटलं होतं

टॅग्स :BJPभाजपा