शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

माझी बदली हा सरकारचा प्लॅन, नरेंद्र मोदींची दृष्टी; पदभार स्वीकारताच किरेन रिजिजू यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 13:03 IST

किरेन रिजिजू यांनी आज पृथ्वी मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला.

नवी दिल्ली: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना काल पदावरुन तडकाफडकी हटवण्यात आलं आहे. आता कायदा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

न्यायालयीन नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारच्या अधिकारांवर न्याययंत्रणेने आक्रमण केल्याचा दावा करून किरेन रिजिजू यांनी अनेकदा जाहीर टीका केली होती. यंदाच्या वर्षी विविध राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. न्याययंत्रणांबाबत झालेल्या वादांबाबत केंद्र सरकार चिंतित असल्याचं बोलले जात आहे. किरेन रिजिजू यांची बदली झाल्यानंतर विरोधकांनी देखील त्यांच्यावर टीका केली होती. यावर आता किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

किरेन रिजिजू यांनी आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी ते म्हणाले की, विरोधक नक्कीच माझ्यावर टीका करतील आणि विरोधकांनी माझ्या विरोधात बोलणे, टीका करणे ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाही. माझी बदली ही काही शिक्षा नाही, ही सरकारचा प्लॅन आहे. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टी आहे, असं किरेन रिजिजू यांनी सांगितले. 

न्यायालयाचे निकाल अन् धक्के

विधिमंत्री हा केंद्र सरकार व न्याययंत्रणा यांना जोडणारा दुवा असतो. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि किरण रिजिजू यांच्यातील संवाद बंद झाला होता, अशी सूत्रांनी माहिती दिली. दिल्लीतील आप सरकार व नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यातील वादाच्या खटल्याचा न्यायालयाने दिलेला निकाल सरकारसाठी धक्का होता. शिंदे गट-भाजप यांच्या सरकारला न्यायालयाने दिलासा दिला असला तरी राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार