शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माझी बदली हा सरकारचा प्लॅन, नरेंद्र मोदींची दृष्टी; पदभार स्वीकारताच किरेन रिजिजू यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 13:03 IST

किरेन रिजिजू यांनी आज पृथ्वी मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला.

नवी दिल्ली: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना काल पदावरुन तडकाफडकी हटवण्यात आलं आहे. आता कायदा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

न्यायालयीन नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारच्या अधिकारांवर न्याययंत्रणेने आक्रमण केल्याचा दावा करून किरेन रिजिजू यांनी अनेकदा जाहीर टीका केली होती. यंदाच्या वर्षी विविध राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. न्याययंत्रणांबाबत झालेल्या वादांबाबत केंद्र सरकार चिंतित असल्याचं बोलले जात आहे. किरेन रिजिजू यांची बदली झाल्यानंतर विरोधकांनी देखील त्यांच्यावर टीका केली होती. यावर आता किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

किरेन रिजिजू यांनी आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी ते म्हणाले की, विरोधक नक्कीच माझ्यावर टीका करतील आणि विरोधकांनी माझ्या विरोधात बोलणे, टीका करणे ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाही. माझी बदली ही काही शिक्षा नाही, ही सरकारचा प्लॅन आहे. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टी आहे, असं किरेन रिजिजू यांनी सांगितले. 

न्यायालयाचे निकाल अन् धक्के

विधिमंत्री हा केंद्र सरकार व न्याययंत्रणा यांना जोडणारा दुवा असतो. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि किरण रिजिजू यांच्यातील संवाद बंद झाला होता, अशी सूत्रांनी माहिती दिली. दिल्लीतील आप सरकार व नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यातील वादाच्या खटल्याचा न्यायालयाने दिलेला निकाल सरकारसाठी धक्का होता. शिंदे गट-भाजप यांच्या सरकारला न्यायालयाने दिलासा दिला असला तरी राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार