शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

हे खरे ‘एकतेचे महाकुंभ’; यात विविधतेतून एकता; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी केला गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 09:46 IST

महाकुंभ हे खरे तर ‘एकतेचे महाकुंभ’ असल्याचे सांगून या भव्य अशा धार्मिक उत्सवातून सर्वांनी समाजातील द्वेष आणि फूट नष्ट करण्याचा संकल्प मनी घेऊन परतावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

नवी दिल्ली : महाकुंभ हे खरे तर ‘एकतेचे महाकुंभ’ असल्याचे सांगून या भव्य अशा धार्मिक उत्सवातून सर्वांनी समाजातील द्वेष आणि फूट नष्ट करण्याचा संकल्प मनी घेऊन परतावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. मासिक ‘मन की बात’मध्ये बोलताना मोदी यांनी पुढील वर्षी १३ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू होत असलेल्या महाकुंभमध्ये सहभागी लोकांच्या माध्यमातून विविधतेतील एकता दिसत असल्याचे सांगितले. या धार्मिक महोत्सवाची भव्यता त्याच्या विविधतेतच असल्याचे ते म्हणाले.

दर १२ वर्षांनी अशा महाकुंभचे आयोजन केले जाते. यात लाखोंच्या संख्येने धार्मिक भावनेतून लोक एकत्र येतात. विविध संतांसह हजारो परंपरा, शेकडो संप्रदाय आणि कित्येक आखाडे या महाकुंभमध्ये सहभागी होतात. तरी कुठेही भेदभावाचा लवलेश नसतो. येथे कुणी लहान, कुणी मोठा नसतो. विविधतेतून एकतेचे असे जगात दुसरे उदाहरण असू शकत नाही. म्हणूनच हा कुंभ एकतेचा महाकुंभ असतो, असे मोदी यांनी नमूद केले.

प्रथमच चॅटबोटचा वापर- यंदा प्रथमच अशा महाकुंभच्या आयोजनात ‘एआय चॅटबोट’चा वापर केला जाणार आहे.- याशिवाय डिजिटल दिशादर्शक प्रणालीची सुविधा पुरवली जाणार असल्याने भाविकांना वेगवेगळ्या मंदिरांत, विविध घाटांवर तसेच साधूंच्या आखाड्यांवर पोहोचण्यात मदत होईल.- ‘एआय चॅटबोट’च्या माध्यमातून महाकुंभाची माहिती ११ भाषांत उपलब्ध असेल, असेही मोदी यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात