शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
4
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
5
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
6
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
7
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
8
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
9
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
10
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
11
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
12
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
13
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
14
'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
15
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
16
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
17
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
19
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
Daily Top 2Weekly Top 5

"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 00:01 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे भारतावर बिनबुडाचे आरोप करण्याचे नाटक पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड झाले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे भारतावर बिनबुडाचे आरोप करण्याचे नाटक पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड झाले आहे. मंगळवारी इस्लामाबाद येथील न्यायालयाबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा दोष भारतावर लादल्याबद्दल, भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देशातील लष्करी प्रेरणेने चाललेल्या घटनात्मक बंडाळीवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान अशा खोट्या कथा रचत असल्याची सडेतोड टीका भारताने केली आहे.

मंगळवारी इस्लामाबादमधील एका न्यायालयाच्या बाहेर आत्मघाती हल्ला झाला. एका आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला बॉम्बने उडवून दिले. हल्लेखोराला कोर्टाच्या आवारात प्रवेश करता आला नाही, त्यामुळे त्याने मुख्य फाटकाजवळ पोलीस वाहनाजवळ स्फोट घडवला. या भीषण हल्ल्यात कमीतकमी १२ लोकांचा मृत्यू झाला आणि २७ हून अधिक जखमी झाले. विशेष म्हणजे, या हल्ल्याची जबाबदारी 'तहरीक-ए-तालिबान' या दहशतवादी गटाने आधीच घेतली आहे.

मात्र, या दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी लगेचच 'भारत कार्ड' बाहेर काढले. पाकिस्तानच्या वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार शरीफ म्हणाले, "हे हल्ले भारत पुरस्कृत दहशतवादाचाच एक भाग आहेत, ज्याचा उद्देश पाकिस्तानला अस्थिर करणे आहे. भारतीय संरक्षणात अफगाणिस्तानच्या भूमीतून होत असलेल्या या हल्ल्यांचा जितका निषेध करावा तितका कमी आहे."

भारताकडून थेट उत्तर

शहबाज शरीफ यांच्या या आरोपांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी तात्काळ आणि अत्यंत कठोर भाषेत प्रत्युत्तर दिले. रणधीर जयस्वाल यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, "भारत, भ्रमात जीवन जगणाऱ्या पाकिस्तानी नेतृत्वाने लावलेले हे निराधार आरोप स्पष्टपणे फेटाळतो. देशात सध्या सुरू असलेल्या लष्करी-प्रेरित घटनात्मक मोडतोडी आणि सत्ता बळकावण्याच्या प्रयत्नांकडून स्वतःच्या लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भारताविरुद्ध खोट्या कथा रचणे, ही पाकिस्तानची नेहमीची आणि अपेक्षित चाल आहे. जगभरातील लोकांना पाकिस्तानचे हे सत्य माहीत आहे. पाकिस्तानच्या या हताशपणे लक्ष विचलित करणाऱ्या युक्त्यांनी आता कुणालाही गैरसमज होणार नाही."

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Blames India for Islamabad Blast; India Retaliates Sharply

Web Summary : Pakistan accused India of involvement in the Islamabad blast, a claim India strongly refuted. India stated Pakistan deflects attention from internal issues by making false accusations. A terrorist group claimed responsibility for the blast.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत