शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान", सरसंघचालक भागवत यांच्यावर विरोधकांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:03 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाचे राजकीय पडसाद उमटले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेने (ठाकरे) भागवत यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. 

'परकीय आक्रमण झेलणाऱ्या भारताला खरं स्वातंत्र्य तेव्हा मिळाले, जेव्हा राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली', असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. त्यांच्या विधानावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा हा महत्त्वाचा दिवस आहे, पण खरं स्वातंत्र्य मिळालं म्हणणं हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेही यावरून टीका केली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

काँग्रेसचे नेते राशीद अल्वी म्हणाले, "भाजपच्या खासदार कंगना रणौतही असे म्हणाल्या होत्या की, देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं. त्यानंतर आता आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत म्हणत आहेत की, राम मंदिर बनल्यानंतर देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं. मग १५ ऑगस्ट १९४७ काय झालं होतं? २६ जानेवारी या दिवसाचे इतके महत्त्व का आहे?  जर हे खरं स्वातंत्र्य आहे, तर मला हे म्हणताना वेदना होताहेत की, ते महात्मा गांधी आणि सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करत आहेत."

अल्वि पुढे म्हणाले की, "राम मंदिर बनने आणि त्यात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणे निश्चितच एक महत्वाचा दिवस आहे. याबद्दल अजिबात शंका नाही. पण, असं म्हणणं की, प्राण प्रतिष्ठा दिनीच खरे स्वातंत्र्य मिळाले, हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे."

ठाकरेंच्या शिवसेनेची टीका

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना रामाच्या नावावर राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. 

"आरएसएस सरसंघचालक एक सन्मानीय व्यक्ती आहेत, पण ते संविधानाचे निर्माते नाहीत. ते या देशातील कायद्यांचा मसुदा तयार करत नाहीत, त्यात बदल करत नाहीत. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणे, देशासाठी अभिमानाचा क्षण होता आणि मंदिर व्हावे म्हणून सगळ्यांनी योगदान दिले आहे. पण, असा दावा करणे की, देश आता स्वतंत्र झाला आहे, हे चुकीचे आहे. त्यांनी रामलल्लाच्या नावावर राजकारण करायला नको", असे संजय राऊत म्हणाले. 

भारताने अनेक शतके आक्रमणे झेलली 

मोहन भागवत म्हणाले होते की, मागील अनेक शतके भारताने परकीय आक्रमणांना तोंड दिलं. भारताला खरं स्वातंत्र्य मागच्या वर्षी अयोध्येमध्ये राम मंदिर बनल्यानंतर मिळालं. रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण होत असून, हा दिवस प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा केला पहिजे", असे विधान भागवत यांनी केले होते. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतSanjay Rautसंजय राऊतRam Mandirराम मंदिरcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ