शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 17:00 IST

Lok Sabha Election 2024: प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि अभ्यासक प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी या निवडणुकीत सत्तांतर होण्याची शक्यता नाकारतानाच भाजपाला  मागच्या वेळच्या ३०३ पेक्षा थोड्या जास्त किंवा तेवढ्याच जागा मिळतील, असा दावा केला आहे. मात्र मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकल्या तरी ही निवडणूक मोदींची (Narendra Modi) बेस्ट इनिंग नसेल, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला आहे.  

लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांमधील मतदान आटोपल्यानंतर आता या निवडणुकीत कोण बाजी मारेल, याबाबत राजकीय विश्लेषक आकडेवारीसोबत अंदाज व्यक्त करत आहे. प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि अभ्यासक प्रशांत किशोर यांनी या निवडणुकीत सत्तांतर होण्याची शक्यता नाकारतानाच भाजपाला  मागच्या वेळच्या ३०३ पेक्षा थोड्या जास्त किंवा तेवढ्याच जागा मिळतील, असा दावा केला आहे. मात्र मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकल्या तरी ही निवडणूक मोदींची बेस्ट इनिंग नसेल, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला आहे.  

प्रशांत किशोर या निवडणुकीतील भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य कामगिरीबाबत भाकित करताना म्हणाले की, अधिक जागा जिंकूनही ही निवडणूक मोदींची बेस्ट इनिंग नसेल. ही बाब समजावून देताना प्रशांतकिशोर यांनी क्रिकेटचं उदाहरण दिलं. ते म्हणाले समजा विराट कोहलीने एका डावात अगदी प्लॉलेस १०१ धावा काढल्या आणि अन्य कुठल्या तरी दुसऱ्या डावात विराटने १४० धावा काढल्या. मात्र त्या खेळीदरम्यान त्याचे सहा झेल सुटले. रेकॉर्डवर दोन्ही खेळींसमोर शतक असा उल्लेख असेल. मात्र तुम्ही कुठल्या खेळीला उत्तम मानणार? जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा रेकॉर्ड बुकमध्ये हे सुद्धा लिहिलं जाईल की, जर झेल  सुटले नसते तर कदाचित... तसेच तुम्ही विराट कोहलीला जरी विचारलं की दोन्हींपैकी उत्तम खेळी कुठली होती, तरी तो १०१ धावा काढली खेळी उत्तम होती असं सांगेल.

त्यामुळेच मी सांगतो की, २०१४ चा विजय नरेंद्र मोदींचा प्लॉलेस विजय होता. तो अपेक्षांचा विजय होता. लोकांना वाटत होतं की  मोदी येतील आणि देश बदलेल.  तर २०१९ मधील मोदींचा विजय हा विश्वासाचा विजय होता. २०१९ मध्ये नरेंद्र मोदींना विश्वासाने मतदान झालं होतं. मात्र २०१४ मधील मोदींचा विजय हा कुठला अन्य पर्याय नसल्याने मिळालेला विजय असेल.  २०१४ मध्ये मोदींसमोर कुठलाही चांगला आव्हानवीर उभा राहिला नाही. मोदी जिंकून येतील आणि सरकार स्थापन करतील, हे नाकारता येणार नाही.  मात्र मोदींसाठी जी अंधभक्ती होती. जो विश्वास होता. जो पाठिंब होता, तो कुठल्याही लोकनेत्याची ताकद असते. मात्र त्याचं प्रमाण आता कमी झालं आहे, असं निरीक्षण प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं आहे. 

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, त्यामुळेच यावेळी जमिनीवर मोदींच्या नावाची कुठलीही लाट दिसत नाही आहे. अॅनॅलिटिकल टुल्स, डेटा आणि मुलाखतींचा टीआरपी, सर्वांना एकत्र करून पाहिल्यास इंटेन्सिटीमध्ये घट झाली आहे.  पुन्हा सत्तेवर आल्यानंतर मोदींसमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानाबाबत बोलताना प्रशांत किशोर ायंनी सांगितले की, देशाच्या ग्रामीण भागातील असंतोष आता हळुहळू मोठा मुद्दा बनत चालला आहे. दुसरा मुद्दा असमानता आहे, तो सिटिंग टाइमबॉम्ब आहे. तसेच बेरोजगारी हाही एक गंभीर मुद्दा आहे. या तिन्ही गोष्टी कुठल्याही सरकारसाठी आव्हान बनणार आहेत.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Prashant Kishoreप्रशांत किशोरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा