शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 15:34 IST

Amit Shah : ही निवडणूक तीन घराण्यांची राजवट संपवणार आहे, असे अमित शाह म्हणाले.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी निवडणुकीत होत आहे. यासाठी राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज जम्मू-काश्मीरमधील मेंढर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका. ही निवडणूक तीन घराण्यांची राजवट संपवणार आहे. अब्दुल्ला, मुफ्ती आणि नेहरू-गांधी ही तीन घराणं आहेत. या तिन्ही घराण्यांनी इथे लोकशाही थांबवली होती. जर, २०१४ मध्ये मोदींचे सरकार आले नसते तर पंचायत, ब्लॉक आणि जिल्हा निवडणुका झाल्या नसत्या, असे अमित शाह म्हणाले.

याचबरोबर, अमित शाह यांनीही जम्मू-काश्मीरमध्ये पसरलेल्या दहशतवादासाठी या तीन कुटुंबांना जबाबदार धरले. ते म्हणाले, ९० च्या दशकात फारुख यांच्या मेहरबानीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आला. ९० च्या दशकात इथे मोठ्या प्रमाणात गोळीबार व्हायचा, कारण इथले सूत्रधार पाकिस्तानला घाबरत होते. पण आता पाकिस्तान नरेंद्र मोदींना घाबरत आहे. गोळीबार करण्याचे त्यांच्यात धाडस नाही. गोळीबार झाला तर गोळीबाराला गोळ्यांनी उत्तर दिले जाईल, असे अमित शाह म्हणाले. 

आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपवला असून तरुणांच्या हातात दगडांऐवजी लॅपटॉप दिले आहेत. एक काळ असा होता की तरुणांची स्वप्ने पायदळी तुडवली जायची आणि आज अशी वेळ आली आहे जेव्हा मोदी सरकारच्या धोरणांमुळे अमृत पिढी जगामध्ये देशाचे नाव तर उंचावत आहेच, शिवाय एक महत्त्वाचे कार्य करत आहे. विकसित भारताच्या उभारणीत योगदान देत आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील लोकांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर अमित शाह म्हणाले, मोदी आल्यानंतर ओबीसी, मागासवर्गीय, गुर्जर बकरवाल आणि पहाडींना आरक्षण मिळाले. मी विधेयक मांडले तेव्हा फारुख अब्दुल्ला यांच्या पक्षाने त्याला विरोध केला आणि येथील त्यांनी गुर्जर बंधूंना भडकावण्यास सुरुवात केली. मी राजौरीला आलो तेव्हा गुर्जर बांधवांचे आरक्षण कमी करणार नाही, असे वचन दिले होते. तर आम्ही गुर्जर, बकरवाल आणि पहाडींनाही बढतीत आरक्षण देण्याचे सांगत आहोत, असे अमित शाह यांनी सांगितले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा