शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 15:34 IST

Amit Shah : ही निवडणूक तीन घराण्यांची राजवट संपवणार आहे, असे अमित शाह म्हणाले.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी निवडणुकीत होत आहे. यासाठी राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज जम्मू-काश्मीरमधील मेंढर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका. ही निवडणूक तीन घराण्यांची राजवट संपवणार आहे. अब्दुल्ला, मुफ्ती आणि नेहरू-गांधी ही तीन घराणं आहेत. या तिन्ही घराण्यांनी इथे लोकशाही थांबवली होती. जर, २०१४ मध्ये मोदींचे सरकार आले नसते तर पंचायत, ब्लॉक आणि जिल्हा निवडणुका झाल्या नसत्या, असे अमित शाह म्हणाले.

याचबरोबर, अमित शाह यांनीही जम्मू-काश्मीरमध्ये पसरलेल्या दहशतवादासाठी या तीन कुटुंबांना जबाबदार धरले. ते म्हणाले, ९० च्या दशकात फारुख यांच्या मेहरबानीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आला. ९० च्या दशकात इथे मोठ्या प्रमाणात गोळीबार व्हायचा, कारण इथले सूत्रधार पाकिस्तानला घाबरत होते. पण आता पाकिस्तान नरेंद्र मोदींना घाबरत आहे. गोळीबार करण्याचे त्यांच्यात धाडस नाही. गोळीबार झाला तर गोळीबाराला गोळ्यांनी उत्तर दिले जाईल, असे अमित शाह म्हणाले. 

आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपवला असून तरुणांच्या हातात दगडांऐवजी लॅपटॉप दिले आहेत. एक काळ असा होता की तरुणांची स्वप्ने पायदळी तुडवली जायची आणि आज अशी वेळ आली आहे जेव्हा मोदी सरकारच्या धोरणांमुळे अमृत पिढी जगामध्ये देशाचे नाव तर उंचावत आहेच, शिवाय एक महत्त्वाचे कार्य करत आहे. विकसित भारताच्या उभारणीत योगदान देत आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील लोकांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर अमित शाह म्हणाले, मोदी आल्यानंतर ओबीसी, मागासवर्गीय, गुर्जर बकरवाल आणि पहाडींना आरक्षण मिळाले. मी विधेयक मांडले तेव्हा फारुख अब्दुल्ला यांच्या पक्षाने त्याला विरोध केला आणि येथील त्यांनी गुर्जर बंधूंना भडकावण्यास सुरुवात केली. मी राजौरीला आलो तेव्हा गुर्जर बांधवांचे आरक्षण कमी करणार नाही, असे वचन दिले होते. तर आम्ही गुर्जर, बकरवाल आणि पहाडींनाही बढतीत आरक्षण देण्याचे सांगत आहोत, असे अमित शाह यांनी सांगितले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा