शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

CoronaVirus Live Updates : "तिसऱ्या लाटेचा धोका, कोरोना लसीकरणाचा वेग, रुग्णालयांची क्षमता वाढवण्यावर भर"; अर्थमंत्र्यांची महत्त्वाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 11:26 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना संक्रमणाची तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्याचा परिणाम कमीत कमी व्हावा यासाठी संभाव्य प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. केरळ आणि देशातील काही राज्यांमध्ये कोरोनामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात म्हणून या संक्रमणाच्या वाढलेल्या आकड्याकडे पाहिलं जात असल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान सरकारकडून आरोग्यव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनीही या कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. तसेच कोरोना संक्रमणाची तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्याचा परिणाम कमीत कमी व्हावा यासाठी संभाव्य प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची आवश्यकता आहे. याचाच एक भाग म्हणून देशात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे. देशाला प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सेस सोबतच चाचणी सुविधांची आणखी गरज भासू शकते, असं सांगतानाच लहान आणि मध्यम दर्जाच्या शहरांत रुग्णालयांची क्षमता वाढवण्याची गरजही अर्थमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी आरोग्य सुविधा मजबूत करण्याच्या संदर्भात एका वेबिनारला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं आहे. 

"देशात सध्या एक हजार व्यक्तींमागे फक्त एक बेड"

वेबिनारमध्ये बोलताना, नीती आयोगाचे सदस्य आणि कोरोनाशी निगडीत टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही के पॉल यांनी रुग्णालयात रुग्णांसाठी बेडची संख्या खूपच कमी असल्याची उणीव व्यक्त केली. तुलनात्मक आकडा देताना डॉ. पॉल यांनी देशात सध्या एक हजार व्यक्तींमागे फक्त एक बेड उपलब्ध असणं ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलं आहे. हजार व्यक्तींमागे कमीत कमी दोन बेड उपलब्ध असणं गरजेचं असल्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. सध्या बेडसची संख्या जवळपास 12 लाख आहे ही संख्या 24-25 लाखांपर्यंत नेण्याची गरज डॉ. पॉल यांनी व्यक्त केली.

"कोरोना परिस्थितीच्या सुरुवातीपासूनच आरोग्य व्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न"

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सरकारकडून कोरोना परिस्थितीच्या सुरुवातीपासूनच आरोग्य व्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल सात दशकांत देशातील रुग्णालयात जवळपास 16 हजार व्हेंटिलेटरची सुविधा होती तिथेच गेल्या दीड वर्षांत ही संख्या 60 हजारांहून अधिक करण्यात आल्याचं राजेश भूषण यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,28,10,845 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41,965 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 460 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,39,020 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारतhospitalहॉस्पिटल