शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

CoronaVirus Live Updates : "तिसऱ्या लाटेचा धोका, कोरोना लसीकरणाचा वेग, रुग्णालयांची क्षमता वाढवण्यावर भर"; अर्थमंत्र्यांची महत्त्वाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 11:26 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना संक्रमणाची तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्याचा परिणाम कमीत कमी व्हावा यासाठी संभाव्य प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. केरळ आणि देशातील काही राज्यांमध्ये कोरोनामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात म्हणून या संक्रमणाच्या वाढलेल्या आकड्याकडे पाहिलं जात असल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान सरकारकडून आरोग्यव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनीही या कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. तसेच कोरोना संक्रमणाची तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्याचा परिणाम कमीत कमी व्हावा यासाठी संभाव्य प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची आवश्यकता आहे. याचाच एक भाग म्हणून देशात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे. देशाला प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सेस सोबतच चाचणी सुविधांची आणखी गरज भासू शकते, असं सांगतानाच लहान आणि मध्यम दर्जाच्या शहरांत रुग्णालयांची क्षमता वाढवण्याची गरजही अर्थमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी आरोग्य सुविधा मजबूत करण्याच्या संदर्भात एका वेबिनारला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं आहे. 

"देशात सध्या एक हजार व्यक्तींमागे फक्त एक बेड"

वेबिनारमध्ये बोलताना, नीती आयोगाचे सदस्य आणि कोरोनाशी निगडीत टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही के पॉल यांनी रुग्णालयात रुग्णांसाठी बेडची संख्या खूपच कमी असल्याची उणीव व्यक्त केली. तुलनात्मक आकडा देताना डॉ. पॉल यांनी देशात सध्या एक हजार व्यक्तींमागे फक्त एक बेड उपलब्ध असणं ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलं आहे. हजार व्यक्तींमागे कमीत कमी दोन बेड उपलब्ध असणं गरजेचं असल्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. सध्या बेडसची संख्या जवळपास 12 लाख आहे ही संख्या 24-25 लाखांपर्यंत नेण्याची गरज डॉ. पॉल यांनी व्यक्त केली.

"कोरोना परिस्थितीच्या सुरुवातीपासूनच आरोग्य व्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न"

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सरकारकडून कोरोना परिस्थितीच्या सुरुवातीपासूनच आरोग्य व्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल सात दशकांत देशातील रुग्णालयात जवळपास 16 हजार व्हेंटिलेटरची सुविधा होती तिथेच गेल्या दीड वर्षांत ही संख्या 60 हजारांहून अधिक करण्यात आल्याचं राजेश भूषण यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,28,10,845 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41,965 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 460 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,39,020 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndiaभारतhospitalहॉस्पिटल