शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

दिवाळीच्या मुहूर्तावर धावणार तिसरी ‘राजधानी’, मुंबई-दिल्ली प्रवास आणखी जलद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 4:19 AM

बहुचर्चित आणि वेगवान अशी तिसरी राजधानी एक्स्प्रेस १६ आॅक्टोबरपासून धावणार आहे. मुंबई-दिल्ली मार्गावर आठवड्यातील तीन दिवस ही ट्रेन धावणार आहे.

मुंबई : बहुचर्चित आणि वेगवान अशी तिसरी राजधानी एक्स्प्रेस १६ आॅक्टोबरपासून धावणार आहे. मुंबई-दिल्ली मार्गावर आठवड्यातील तीन दिवस ही ट्रेन धावणार आहे. या राजधानी एक्स्प्रेसमुळे मुंबई-दिल्ली हे १ हजार ३६५ किलोमीटरचे अंतर १३ तास ५५ मिनिटांत पूर्ण करता येईल. नवीन एक्स्प्रेसमध्ये सेकंड वातानुकूलित ७०० ते ८०० आणि तृतीय वातानुकूलितसाठी ५०० ते ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या धावत असलेल्या राजधानीच्या तुलनेत १९ टक्के भाडे कमी असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील अंतर जलद गतीने पूर्ण करण्यासाठी नवीन राजधानी एक्स्प्रेस आणण्यात आली. नव्या एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी आधुनिक डब्ल्यूएपी ५ श्रेणीतील २ इंजिन जोडण्यात येणार आहेत. दोन्ही इंजिन ५ हजार ४०० अश्वशक्ती आहे. यांची कमाल वेगमर्यादा १३० किलोमीटर प्रतितास आहे.एक प्रथम वातानुुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, १२ तृतीय वातानुकूलित आणि एक पेन्ट्री बोगी असे स्वरूप विशेष राजधानीचे असणार आहे. नवीन एक्स्प्रेसचे तिकीट दर बदलत्या दरांनुसार आकारले जाणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.विशेष राजधानी एक्स्प्रेसनुसार मुंबई-दिल्ली हे अंतर १३ तास ५५ मिनिटांत पूर्ण करण्यात येणार आहे. एकच रेक असल्यामुळे आठवड्यातून तीन दिवस ही गाडी धावणार आहे. सध्या धावत असलेल्या राजधानी एक्स्प्रेसला मुंबई-दिल्ली हे अंतर पूर्ण करण्यासाठी १५ तास ५० मिनिटांचा वेळ लागत आहे. सद्यस्थितीत मुंबई-दिल्ली मार्गावर २ राजधानी एक्स्प्रेससह ३० मेल एक्स्प्रेस धावतात.विशेष राजधानी मुंबई-दिल्लीवांद्रे टर्मिनस येथून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दिल्लीच्या दिशेने ही गाडी मार्गस्थ होणार आहे. दुपारी ४.०५ मिनिटांनी ही राजधानी सुटणार असून, दुसºया दिवशी सकाळी ६ वाजता हजरत निजामुद्दीन (दिल्ली) स्थानकावर पोहोचणार आहे.

टॅग्स :Rajdhani Expressराजधानी एक्स्प्रेसMumbaiमुंबईNew Delhiनवी दिल्ली