शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सुषमा स्वराज यांना राज्यसभेच्या मार्गाने सरकारमध्ये आणण्यावर विचारमंथन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 05:11 IST

नव्या सरकारच्या कामात अडथळा येऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या टीममधील काही अनुभवी व जुन्या चेहऱ्यांना कायम ठेवण्याच्या विचारात आहेत.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : नव्या सरकारच्या कामात अडथळा येऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या टीममधील काही अनुभवी व जुन्या चेहऱ्यांना कायम ठेवण्याच्या विचारात आहेत. अशा नावांमध्ये नितीन गडकरी, सुषमा स्वराज, रविशंकर प्रसाद, राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. सुषमा स्वराज यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली नसल्यामुळे त्यांना राज्यसभेच्या मार्गाने टीम मोदीमध्ये सहभागी करून घेण्यावर विचार सुरू आहे. विदेश मंत्रालयात सुषमा स्वराज यांनी मागील पाच वर्षांत ज्या पद्धतीने काम केले आहे, ते पाहता भारताची प्रतिष्ठा जगभरात वाढली आहे. विशेषकरून टिष्ट्वटरच्या माध्यमातून त्यांनी विदेशमंत्री या नात्याने ज्या पद्धतीने लोकांची मदत केली, त्याची जागतिक स्तरावर चर्चा होत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांची सामाजिक स्वीकारार्हता कायम राहिली आहे, असे चेहरे केंद्रीय मंत्रिमंडळात कायम राहावेत, अशी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच इच्छा आहे. त्यात सुषमा स्वराज यांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर ज्यांनी सर्वांत आधी मोदींचे नेतृत्व मान्य करून २०१९ची विजयी मोहीम सुरू केली होती, भाजपच्या निवडक महिला नेत्यांमध्ये सुषमा स्वराज आहेत. परखड वक्ता असण्याबरोबरच भारतीय संस्कृती स्थापित करणाºया नेत्यांत त्या आघाडीवर आहेत.भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी हे स्वराज यांच्याकडे आदराने पाहतात. कदाचित स्वराज यांच्याकडेच पुन्हा एकदा विदेश मंत्रालयाचा कार्यभार सोपवला जाऊ शकतो. तथापि, काही जण या पदासाठी निर्मला सीतारामन यांचे नावही घेत आहेत.एका नेत्याने सांगितले की, सुषमा स्वराज यांनी म्हटले होते की, त्या लोकसभा निवडणूक लढवत नाहीत. मात्र, त्या राजकारणापासून वेगळ्या होत नाहीत.>वरील सर्व घडामोडी एका बाजूला सुरू असतानाच दुसरीकडे अमेठीतून सर्वांत मोठा विजय प्राप्त करणाºया स्मृती इराणी यांच्याबरोबरच प्रकाश जावडेकर, राज्यवर्धन राठोड, धर्मेंद्र प्रधान यांनाही मंत्रिपद देण्याची चर्चा सुरू आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे विश्वासू भूपेंद्र यादव, कैलाश विजयवर्गीय यांनाही राजकीय रूपाने पुरस्कृत करण्याची चर्चा आहे. संघटनेतील काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात आणण्याबरोबरच सरकारमधील काही जणांना संघटनेत पाठवण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज