शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
4
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
5
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
6
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
7
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
8
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
9
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
10
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
11
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
12
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
13
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
14
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
15
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
16
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
17
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
18
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
19
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
20
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?

"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 14:30 IST

रामबन येथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला. तर बचाव पथकाने १०० लोकांचा जीव वाचवला आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील रामबन येथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला. तर बचाव पथकाने १०० लोकांचा जीव वाचवला आहे. अनेक वाहनं अजूनही ढिगाऱ्यात अडकली आहेत. घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. रामबन येथील दुकानदार रवी कुमार म्हणाले की, त्यांची दोन दुकानं होती, पण ती एका रात्रीत गायब झाली.

"संपूर्ण बाजारपेठ वाहून गेली"

रामबन येथील रहिवासी ओम सिंह यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, "मी दुसऱ्या बाजूला राहतो, पण तिथेही पाण्याचा प्रवाह खूप वेगवान होता, आम्ही वेळेवर येथे पोहोचू शकलो नाही. जेव्हा मी येथे पोहोचलो तेव्हा मला दिसले की माझ्या दुकानासह संपूर्ण बाजारपेठ अचानक गायब झाली होती. असं काहीतरी मी पहिल्यांदाच पाहत आहे." रामबन येथील दुकानदार रवी कुमार म्हणाले, "माझी बाजारात दोन दुकानं होती. जेव्हा आम्हाला सकाळी चार वाजता कळलं की संपूर्ण बाजारपेठ वाहून गेली आहे, तेव्हा आम्ही येथे पोहोचलो आणि आढळलं की येथे काहीही शिल्लक राहिलेलं नाही."

"आता आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन"

"एका रात्रीत सर्व काही उद्ध्वस्त झालं. मदतीसाठी कोणाशी संपर्क साधावा किंवा काय करावं हे आम्हाला माहित नव्हतं. आम्हाला काहीच समजत नव्हतं. ही दुकानं आमच्या उपजीविकेचं एकमेव साधन होती. आता आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन. मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी येऊन आम्हाला मदत करावी. ते खूपच भयानक दृश्य होतं, कल्पनेच्या पलीकडंच... आमचं कर्ज माफ व्हावं कारण आमच्याकडे आता काहीही शिल्लक नाही." रामबनचे एसएसपी कुलबीर सिंह यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे आणि धरम कुंडमधून सुमारे १०० लोकांना वाचवण्यात आले आहे अशी माहिती दिली. 

ढिगाऱ्यात अडकली अनेक वाहनं

रामबन येथील रहिवासी सुनील कुमार यांना भूस्खलनामुळे त्यांच्या कारचं खूप नुकसान झालं आहे यावर विश्वास बसत नाही. त्यांनी एएनआयला सांगितलं की, "मी जम्मूहून श्रीनगरला जात होतो. पाऊस पडत असल्याने मी रामबनमध्ये एक हॉटेल बुक केलं होतं. ३ वाजता ही घटना घडली. जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मला दिसलं की हॉटेलचे दोन मजले ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. वरच्या मजल्यावर सुमारे १५ लोक होते. आम्ही त्या सर्वांना वाचवलं. भूस्खलनामुळे माझी नवीन गाडी पूर्णपणे खराब झाली आहे. ढिगाऱ्याखाली सुमारे ८-१० गाड्या आहेत." 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरRainपाऊसlandslidesभूस्खलन