शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 14:30 IST

रामबन येथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला. तर बचाव पथकाने १०० लोकांचा जीव वाचवला आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील रामबन येथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला. तर बचाव पथकाने १०० लोकांचा जीव वाचवला आहे. अनेक वाहनं अजूनही ढिगाऱ्यात अडकली आहेत. घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. रामबन येथील दुकानदार रवी कुमार म्हणाले की, त्यांची दोन दुकानं होती, पण ती एका रात्रीत गायब झाली.

"संपूर्ण बाजारपेठ वाहून गेली"

रामबन येथील रहिवासी ओम सिंह यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, "मी दुसऱ्या बाजूला राहतो, पण तिथेही पाण्याचा प्रवाह खूप वेगवान होता, आम्ही वेळेवर येथे पोहोचू शकलो नाही. जेव्हा मी येथे पोहोचलो तेव्हा मला दिसले की माझ्या दुकानासह संपूर्ण बाजारपेठ अचानक गायब झाली होती. असं काहीतरी मी पहिल्यांदाच पाहत आहे." रामबन येथील दुकानदार रवी कुमार म्हणाले, "माझी बाजारात दोन दुकानं होती. जेव्हा आम्हाला सकाळी चार वाजता कळलं की संपूर्ण बाजारपेठ वाहून गेली आहे, तेव्हा आम्ही येथे पोहोचलो आणि आढळलं की येथे काहीही शिल्लक राहिलेलं नाही."

"आता आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन"

"एका रात्रीत सर्व काही उद्ध्वस्त झालं. मदतीसाठी कोणाशी संपर्क साधावा किंवा काय करावं हे आम्हाला माहित नव्हतं. आम्हाला काहीच समजत नव्हतं. ही दुकानं आमच्या उपजीविकेचं एकमेव साधन होती. आता आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन. मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी येऊन आम्हाला मदत करावी. ते खूपच भयानक दृश्य होतं, कल्पनेच्या पलीकडंच... आमचं कर्ज माफ व्हावं कारण आमच्याकडे आता काहीही शिल्लक नाही." रामबनचे एसएसपी कुलबीर सिंह यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आहे आणि धरम कुंडमधून सुमारे १०० लोकांना वाचवण्यात आले आहे अशी माहिती दिली. 

ढिगाऱ्यात अडकली अनेक वाहनं

रामबन येथील रहिवासी सुनील कुमार यांना भूस्खलनामुळे त्यांच्या कारचं खूप नुकसान झालं आहे यावर विश्वास बसत नाही. त्यांनी एएनआयला सांगितलं की, "मी जम्मूहून श्रीनगरला जात होतो. पाऊस पडत असल्याने मी रामबनमध्ये एक हॉटेल बुक केलं होतं. ३ वाजता ही घटना घडली. जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मला दिसलं की हॉटेलचे दोन मजले ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. वरच्या मजल्यावर सुमारे १५ लोक होते. आम्ही त्या सर्वांना वाचवलं. भूस्खलनामुळे माझी नवीन गाडी पूर्णपणे खराब झाली आहे. ढिगाऱ्याखाली सुमारे ८-१० गाड्या आहेत." 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरRainपाऊसlandslidesभूस्खलन