शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

चोरट्यांनी चक्क ट्रांसफॉर्मर पळवला; संपूर्ण गाव 25 दिवसांपासून अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 21:11 IST

ट्रान्सफॉर्मर चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील सोर्हा गावात मागील 25 दिवसांपासून वीज आलेली नाही. याचे कारण म्हणजे, चोरट्यांनी चक्क गावातील 250 KVA चा ट्रांसफॉर्मर चोरुन नेला. ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याने 14 डिसेंबरपासून गावकरी वीजेविना जगत आहेत. 

5 हजार लोक अंधारातचोरीची माहिती मिळताच पोलीस व विद्युत विभागाने तपास सुरू केला, मात्र 25 दिवस उलटले, तरी गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आलेला नाही. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेले हे गाव 25 दिवसांपासून अंधारात बुडाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत असून, आता वीज नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

विद्यार्थी अभ्यास करू शकत नाहीतवीज नसल्याचा सर्वाधिक फटका फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या उत्तर प्रदेश बोर्डाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. विजेशिवाय विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करता येत नसल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

गावप्रमुख सतपाल सिंह म्हणाले, वीज नसल्यामुळे मुलांचे शिक्षण आणि गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम झाला आहे. इन्व्हर्टर आणि मोबाइल चार्जिंगसारख्या मूलभूत गरजाही उपलब्ध नाहीत. ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे. उघैती वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता अशोक कुमार म्हणाले, ट्रान्सफॉर्मर चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. एक-दोन दिवसांत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येईल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी