शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

ते लोक माझ्या जीवावर उठलेत- केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 18:47 IST

हल्ल्यानंतर प्रथमच केजरीवाल यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद

नवी दिल्ली : माझ्यावर हल्ले होत नाहीत. तर ते जाणूनबुजून घडवले जात आहेत, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. काल सचिवालयात केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. यानंतर केजरीवाल यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्यावर काल झालेल्या हल्ल्यासाठी आम आदमी पार्टीनं भाजपाला जबाबदार धरलं आहे. 'माझ्यावर दोन वर्षात चार हल्ले झाले आहेत. ही साधीसुधी बाब नाही. हे हल्ले होत नाहीत. तर ते घडवून आणले जात आहेत. या हल्ल्यांसाठी आदेश दिले जात आहेत. आम्ही यांच्यासाठी अडथळा ठरत आहोत. त्यामुळेच हे सर्व मिळून माझ्या जीवावर उठले आहेत. हे लोक वारंवार आमच्यावर हल्ले करत आहेत,' असा आरोप केजरीवाल यांनी केला. केजरीवाल यांच्यावर काल सचिवालयात हल्ला झाला. केजरीवाल त्यांच्या चेंबरमधून एक व्यक्ती त्यांच्याजवळ आली. या व्यक्तीनं बोलता बोलता अचानक केजरीवालांवर मिरचीपूड फेकली. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं. या व्यक्तीचं नाव अनिल असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपच्या अनेक नेत्यांनी या हल्ल्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपाच्या नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ही संपूर्ण घटना म्हणजे ड्रामा असल्याचं भाजपा नेत्यांनी म्हटलं आहे. निवडणूक जवळ आल्यामुळे आपकडून ड्रामा सुरू झाला आहे, असा दावा दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला आहे. निवडणूक जवळ येऊ लागताच केजरीवालांवर हल्ले होऊ लागतात. त्यामुळे यामागचं सत्य समोर यायला हवं, असं तिवारी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपा