शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

ते लोक माझ्या जीवावर उठलेत- केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 18:47 IST

हल्ल्यानंतर प्रथमच केजरीवाल यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद

नवी दिल्ली : माझ्यावर हल्ले होत नाहीत. तर ते जाणूनबुजून घडवले जात आहेत, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. काल सचिवालयात केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. यानंतर केजरीवाल यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्यावर काल झालेल्या हल्ल्यासाठी आम आदमी पार्टीनं भाजपाला जबाबदार धरलं आहे. 'माझ्यावर दोन वर्षात चार हल्ले झाले आहेत. ही साधीसुधी बाब नाही. हे हल्ले होत नाहीत. तर ते घडवून आणले जात आहेत. या हल्ल्यांसाठी आदेश दिले जात आहेत. आम्ही यांच्यासाठी अडथळा ठरत आहोत. त्यामुळेच हे सर्व मिळून माझ्या जीवावर उठले आहेत. हे लोक वारंवार आमच्यावर हल्ले करत आहेत,' असा आरोप केजरीवाल यांनी केला. केजरीवाल यांच्यावर काल सचिवालयात हल्ला झाला. केजरीवाल त्यांच्या चेंबरमधून एक व्यक्ती त्यांच्याजवळ आली. या व्यक्तीनं बोलता बोलता अचानक केजरीवालांवर मिरचीपूड फेकली. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं. या व्यक्तीचं नाव अनिल असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपच्या अनेक नेत्यांनी या हल्ल्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपाच्या नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ही संपूर्ण घटना म्हणजे ड्रामा असल्याचं भाजपा नेत्यांनी म्हटलं आहे. निवडणूक जवळ आल्यामुळे आपकडून ड्रामा सुरू झाला आहे, असा दावा दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला आहे. निवडणूक जवळ येऊ लागताच केजरीवालांवर हल्ले होऊ लागतात. त्यामुळे यामागचं सत्य समोर यायला हवं, असं तिवारी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपा