शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांना आपला इतिहास माहित नाही', CAA वर टीका करणाऱ्यांना जयशंकर यांचे सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 15:39 IST

'जगभरात अनेक ठिकाणी वंश आणि धर्माच्या नावावर नागरिकत्व दिले गेले.'

S Jaishankar on CAA: केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात नागरिकत्व सुधारणा कायदा(CAA) लागू केला. हा कायदा लागू झाल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी यावर प्रतिक्रिया दिल्या, टीकाही केली. आता त्या सर्व टीकांना भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या कायद्याला फाळणीशी जोडून पाहणे महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, यापूर्वी अनेक देशांनी वंश, धर्माच्या नावावर नागरिकत्व दिल्याचे उदाहरण दिले. 

अमेरिकेने काय म्हटले होते?अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले होते की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अधिसूचनेबद्दल आम्ही चिंतित आहोत. धार्मिक स्वातंत्र्याचा आदर आणि कायद्यानुसार सर्व समुदायांना समान वागणूक ही मूलभूत लोकशाही तत्त्वे आहेत.या कायद्याची अंमलबजावणी कशी होईल यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. 

अमेरिकेला खडसावलेयावर 'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2024' मध्ये बोलताना जयशंकर म्हणाले, 'मी त्यांच्या लोकशाहीतील त्रुटी किंवा त्यांची तत्त्वे आणि कमतरता, यावर प्रश्न उपस्थित केलेला नाही. आपल्या इतिहासाबद्दलच्या त्यांच्या आकलनावर मी प्रश्न उपस्थित करत आहे. धर्माच्या नावावर देशाची फाळणी झाल्यानंतर ज्यां लोकांचा छळ झाला, अशा पीडितांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आणला आहे. या कायद्याद्वारे कोणाचेही नागरिकत्व हिरावले जाणार नाही. काही देश अशा प्रतिक्रिया देत आहेत, जसे काय भारताची कधी फाळणी झालीच नव्हती. '

जगभरात अनेक उदाहरणे...'जगात असे काही गट आहेत, जे एखादी समस्या घेतात आणि त्याचा इतिहास न जाणता त्याला राजकीय रुप देतात. नंतर हेच लोक असे दाखवण्याचा प्रयत्न करतात की, आम्ही सिद्धांतवादी आहोत आणि तुम्ही नाही. त्यामुळेच तुम्ही एखाद्या समस्येबद्दल बोलत असाल, तर त्याच्याशी संबंधित सर्व ऐतिहासिक संदर्भ पाहणे महत्वाचे आहे. जर तुम्ही मला विचाराल की इतर देश, वंश, धर्म, सामाजिक वैशिष्ट्यांच्या आधारे नागरिकत्व देतात का, तर मी तुम्हाला याची अनेक उदाहरणे देऊ शकतो. जग अशा उदाहरणांनी भरलेले आहे,' अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.

'CAA भारताचा अंतर्गत विषय, अमेरिकेने यात पडू नये'

दरम्यान, शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीही पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेला सुनावले होते. अमेरिकेच्या विधानाला प्रत्युत्तर देताना जयस्वाल म्हणाले की, 'नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 ही भारताची अंतर्गत बाब आहे आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत अमेरिकेचे विधान चुकीचे आणि अनावश्यक आहे. या कायद्याद्वारे 31 डिसेंबर 2014 पूर्वी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील अल्पसंख्याकांना नागरिकत्व दिले जाणार आहे. याद्वारे भारतातील कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही.'

'भारतीय राज्यघटना सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याची हमी देते. अल्पसंख्याकांबद्दल कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची नगरज नाही. संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्याच्या स्तुत्य उपक्रमाला व्होट बँकेच्या राजकारणाशी जोडू नये. ज्यांना भारताच्या बहुलवादी परंपरा आणि त्या प्रदेशाच्या फाळणीनंतरच्या इतिहासाविषयी माहिती नाही, त्यांनी या प्रकरणात पडण्याचा प्रयत्न करू नये. भारताच्या हितचिंतकांनी या पाऊलाचे स्वागत केले पाहिजे.'

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmericaअमेरिकाBJPभाजपाcongressकाँग्रेस