शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

"त्यांना अर्थव्यवस्थेचे ज्ञान नाही, काँग्रेसला 60 वर्षांपर्यंत...!" आसामच्या मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 11:03 IST

Union Budget 2025: राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन 'बुलेटच्या जखमेवर बँड-एड', असे केले होते...

मोदी सरकार ३.० चा अर्थसंकल्प शनिवारी (१ फेब्रुवारी) सादर झाला. यानंतर, यावर विविध स्थरांतून, विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही येत आहेत. यातच, राहुल गांधी यांचीही प्रतिक्रिया आली. त्यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन 'बुलेटच्या जखमेवर बँड-एड', असे केले होते. याला आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांना भारतीय अर्थव्यवस्थेचे ज्ञान नाही, असे सरमा यांनी म्हटले आहे. 

"60 वर्षांत 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्नही टॅक्स फ्री करू शकले नाही"राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "काँग्रेसने या अर्थसंकल्पावर टीका करू नये. मध्यमवर्गीयांना किती लाभ झाला आहे हे त्यांनी बघायला हवे. ६० वर्षांच्या राजवटीत काँग्रेसला ५ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्नही करमुक्त करता आले नाही आणि केंद्र सरकारने थेट १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले.

आसामचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "अर्थमंत्र्यांनी केवळ मध्यमवर्गीयांनाच दिलासा दिला नाही, तर अनेक तंत्रज्ञानही करमुक्त केले आहे. तेसेच अनेक कर्करोगाच्या औषधांवरील करही कमी केला आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य राजकीय आहे. त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेचे काहीही ज्ञान नाही."

काय म्हणाले होते राहुल गांधी? - काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना, या अर्थसंकल्पावर टीका केली. तसेच, हा अर्थसंकल्प म्हणजे, 'बुलेटमुळे झालेल्या जखमेवर बँड-एड' लावण्यासारखे असल्याचे म्हणाले होते. याशिवाय, "जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी काही आदर्श बदल आवश्यक होते. मात्र, हे सरकार सुधारणांचा विचार करण्याच्या बाबतीत दिवाळखोर आहे,' असेही राहुल गांधी यांनी म्हटले होते.

 

टॅग्स :AssamआसामRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस