शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:06 IST

४३ वर्षीय अनादी मिश्रा अल्जेरियातील अन्नाबा शहरातील एका स्पंज आयर्न कंपनीत काम करत होते. १८ जुलै रोजी या आयर्न कंपनीत झालेल्या स्फोटात त्यांचे निधन झाले.

चांगली कमाई करून आपल्या कुटुंबाला एक चांगलं आयुष्य द्यावं, अशी प्रत्येकाची ईच्छा असते. काही लोक तर यासाठी घरापासून दूर परदेशात जातात. उत्तर प्रदेशातील एका सामान्य कुटुंबातील मुलाने देखील असंच स्वप्न पाहिलं पण, आता त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील भितरगाव ब्लॉकमधील बारी गावातील ४३ वर्षीय अनादी मिश्रा अल्जेरियातील अन्नाबा शहरातील एका स्पंज आयर्न कंपनीत काम करत होते. १८ जुलै रोजी या आयर्न कंपनीत झालेल्या स्फोटात त्यांचे निधन झाले. ते तिथे ऑपरेटर म्हणून काम करत होते. १२ दिवस उलटूनही त्यांचे पार्थिव गावात पोहोचू शकले नाही. 

मुलाच्या पार्थिवाची वाट पाहणारे वृद्ध वडील राजेंद्र मिश्रा (६८) यांचे बुधवारी निधन झाले. मुलाच्या मृत्युनंतर आता वडिलांच्या मृत्युने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

१८ जून रोजी अनादी मिश्रा यांनी अल्जेरियाच्या स्पंज आयर्न कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या एका महिन्यानंतर, १७ जुलै रोजी कारखान्यात झालेल्या मोठ्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले. दुसऱ्या दिवशी १८ जुलै रोजी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. कुटुंबाला ही बातमी कळताच सर्वांना धक्का बसला. अनादी यांचा धाकटा भाऊ अर्पित मिश्रा यांनी सांगितले की, त्यांचे वडील राजेंद्र मिश्रा आधीच कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीने ते पूर्णपणे खचून गेले होते. त्यांनी खाणे-पिणे बंद केले आणि शेवटपर्यंत मुलाचा मृतदेह येण्याची वाट पाहत राहिले.

१२ दिवसांनंतरही मृतदेह घरी पोहोचला नाही!१२ दिवसांनंतरही अनादीचा मृतदेह भारतात आणता आला नाही. या प्रतीक्षेने हळूहळू कुटुंबाच्या मनावर आघात होत होते.यातच बुधवारी राजेंद्र मिश्रा यांचेही निधन झाले. आता अनादीची आई कांती मिश्रा, वहिनी सुनीता, बहिणी पूनम, प्रीती, स्वाती आणि पुतण्या विभू आणि रिभू, संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

प्रशासनाकडून प्रतिसाद नाही!अर्पित म्हणाले की, मृतदेह आणण्यासाठी प्रशासन आणि कंपनीशी वारंवार संपर्क साधला जात आहे, परंतु अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. कुटुंबाला आता फक्त एवढंच वाटतंय की अनादीचा मृतदेह लवकरात लवकर गावात पोहोचावा, जेणेकरून त्याचा शेवटचा निरोप सन्मानाने देता येईल. या दुःखद घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे.   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशInternationalआंतरराष्ट्रीयDeathमृत्यू