शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:06 IST

४३ वर्षीय अनादी मिश्रा अल्जेरियातील अन्नाबा शहरातील एका स्पंज आयर्न कंपनीत काम करत होते. १८ जुलै रोजी या आयर्न कंपनीत झालेल्या स्फोटात त्यांचे निधन झाले.

चांगली कमाई करून आपल्या कुटुंबाला एक चांगलं आयुष्य द्यावं, अशी प्रत्येकाची ईच्छा असते. काही लोक तर यासाठी घरापासून दूर परदेशात जातात. उत्तर प्रदेशातील एका सामान्य कुटुंबातील मुलाने देखील असंच स्वप्न पाहिलं पण, आता त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील भितरगाव ब्लॉकमधील बारी गावातील ४३ वर्षीय अनादी मिश्रा अल्जेरियातील अन्नाबा शहरातील एका स्पंज आयर्न कंपनीत काम करत होते. १८ जुलै रोजी या आयर्न कंपनीत झालेल्या स्फोटात त्यांचे निधन झाले. ते तिथे ऑपरेटर म्हणून काम करत होते. १२ दिवस उलटूनही त्यांचे पार्थिव गावात पोहोचू शकले नाही. 

मुलाच्या पार्थिवाची वाट पाहणारे वृद्ध वडील राजेंद्र मिश्रा (६८) यांचे बुधवारी निधन झाले. मुलाच्या मृत्युनंतर आता वडिलांच्या मृत्युने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

१८ जून रोजी अनादी मिश्रा यांनी अल्जेरियाच्या स्पंज आयर्न कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या एका महिन्यानंतर, १७ जुलै रोजी कारखान्यात झालेल्या मोठ्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले. दुसऱ्या दिवशी १८ जुलै रोजी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. कुटुंबाला ही बातमी कळताच सर्वांना धक्का बसला. अनादी यांचा धाकटा भाऊ अर्पित मिश्रा यांनी सांगितले की, त्यांचे वडील राजेंद्र मिश्रा आधीच कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीने ते पूर्णपणे खचून गेले होते. त्यांनी खाणे-पिणे बंद केले आणि शेवटपर्यंत मुलाचा मृतदेह येण्याची वाट पाहत राहिले.

१२ दिवसांनंतरही मृतदेह घरी पोहोचला नाही!१२ दिवसांनंतरही अनादीचा मृतदेह भारतात आणता आला नाही. या प्रतीक्षेने हळूहळू कुटुंबाच्या मनावर आघात होत होते.यातच बुधवारी राजेंद्र मिश्रा यांचेही निधन झाले. आता अनादीची आई कांती मिश्रा, वहिनी सुनीता, बहिणी पूनम, प्रीती, स्वाती आणि पुतण्या विभू आणि रिभू, संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

प्रशासनाकडून प्रतिसाद नाही!अर्पित म्हणाले की, मृतदेह आणण्यासाठी प्रशासन आणि कंपनीशी वारंवार संपर्क साधला जात आहे, परंतु अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. कुटुंबाला आता फक्त एवढंच वाटतंय की अनादीचा मृतदेह लवकरात लवकर गावात पोहोचावा, जेणेकरून त्याचा शेवटचा निरोप सन्मानाने देता येईल. या दुःखद घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे.   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशInternationalआंतरराष्ट्रीयDeathमृत्यू