शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:06 IST

४३ वर्षीय अनादी मिश्रा अल्जेरियातील अन्नाबा शहरातील एका स्पंज आयर्न कंपनीत काम करत होते. १८ जुलै रोजी या आयर्न कंपनीत झालेल्या स्फोटात त्यांचे निधन झाले.

चांगली कमाई करून आपल्या कुटुंबाला एक चांगलं आयुष्य द्यावं, अशी प्रत्येकाची ईच्छा असते. काही लोक तर यासाठी घरापासून दूर परदेशात जातात. उत्तर प्रदेशातील एका सामान्य कुटुंबातील मुलाने देखील असंच स्वप्न पाहिलं पण, आता त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील भितरगाव ब्लॉकमधील बारी गावातील ४३ वर्षीय अनादी मिश्रा अल्जेरियातील अन्नाबा शहरातील एका स्पंज आयर्न कंपनीत काम करत होते. १८ जुलै रोजी या आयर्न कंपनीत झालेल्या स्फोटात त्यांचे निधन झाले. ते तिथे ऑपरेटर म्हणून काम करत होते. १२ दिवस उलटूनही त्यांचे पार्थिव गावात पोहोचू शकले नाही. 

मुलाच्या पार्थिवाची वाट पाहणारे वृद्ध वडील राजेंद्र मिश्रा (६८) यांचे बुधवारी निधन झाले. मुलाच्या मृत्युनंतर आता वडिलांच्या मृत्युने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

१८ जून रोजी अनादी मिश्रा यांनी अल्जेरियाच्या स्पंज आयर्न कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या एका महिन्यानंतर, १७ जुलै रोजी कारखान्यात झालेल्या मोठ्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले. दुसऱ्या दिवशी १८ जुलै रोजी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. कुटुंबाला ही बातमी कळताच सर्वांना धक्का बसला. अनादी यांचा धाकटा भाऊ अर्पित मिश्रा यांनी सांगितले की, त्यांचे वडील राजेंद्र मिश्रा आधीच कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीने ते पूर्णपणे खचून गेले होते. त्यांनी खाणे-पिणे बंद केले आणि शेवटपर्यंत मुलाचा मृतदेह येण्याची वाट पाहत राहिले.

१२ दिवसांनंतरही मृतदेह घरी पोहोचला नाही!१२ दिवसांनंतरही अनादीचा मृतदेह भारतात आणता आला नाही. या प्रतीक्षेने हळूहळू कुटुंबाच्या मनावर आघात होत होते.यातच बुधवारी राजेंद्र मिश्रा यांचेही निधन झाले. आता अनादीची आई कांती मिश्रा, वहिनी सुनीता, बहिणी पूनम, प्रीती, स्वाती आणि पुतण्या विभू आणि रिभू, संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

प्रशासनाकडून प्रतिसाद नाही!अर्पित म्हणाले की, मृतदेह आणण्यासाठी प्रशासन आणि कंपनीशी वारंवार संपर्क साधला जात आहे, परंतु अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. कुटुंबाला आता फक्त एवढंच वाटतंय की अनादीचा मृतदेह लवकरात लवकर गावात पोहोचावा, जेणेकरून त्याचा शेवटचा निरोप सन्मानाने देता येईल. या दुःखद घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे.   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशInternationalआंतरराष्ट्रीयDeathमृत्यू