शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

"ते खूप ताकदवान लोक, कुठल्याही थराला जाऊ शकतात"; राघव चड्ढांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 15:17 IST

मला का निलंबित केलंय, माझा काय गुन्हा आहे? असे म्हणत आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत

नवी दिल्ली - राज्यसभेत आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्याविरोधात निलंबनाचा प्रस्ताव मांडला जात आहे. सभागृहातील त्यांच्या वर्तनामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राघव चढ्ढा यांनी राज्यसभा सभागृहातून निलंबनानंतर भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच, हे खूप ताकदवान लोकं आहेत, ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, असे म्हणत थेट गंभीर आरोपही केले आहेत. माझी काहीही चूक नाही, मी कुणाच्याही खोट्या सह्या केल्या नाहीत. विशेष म्हणजे तुम्हाला केवळ खासदारांची नावे सुचवायची असतात, त्यांची सही घ्यायची नसते, असे स्पष्टीकरणही चड्ढा यांनी निलंबनानंतर दिले आहे. 

मला का निलंबित केलंय, माझा काय गुन्हा आहे? असे म्हणत आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत. तसेच, एका ३४ वर्षीय तरुणाने तुम्हाला संसदेत प्रश्न विचारले याचा राग आहे का? एका तरुणाने देशातील सर्वात मोठ्या पक्षाला भाजप आणि अडवाणींच्या भूमिकेची आठवण करु दिली याचं वाईट वाटतंय का?, मी तुमच्याच पक्षाचा जाहिरनामा संसेदत दाखवून प्रश्न विचारले त्याचं दु:ख आहे का? असे म्हणत राघव चड्ढा यांनी खासदारकीच्या निलंबनावरुन मोदी सरकारला आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना प्रश्न केले आहेत. तसेच, हे लोकं खूप ताकदवान आहे, कुठल्याही थराला जाऊ शकतात, असेही चड्ढा यांनी म्हटलं.

याच आठवड्यात मला किमिटी ऑफ प्रिव्हीलेजच्या २ नोटीस आल्या आहेत. हा देखील एक रेकॉर्डच म्हणावा लागेल. सभागृहात सदस्यांना बोलू दिलं जात नाही. विरोधी पक्षनेत्यांचाच माईक बंद केला जातोय. याच पावसाळी अधिवेशना आम आदमी पक्षाच्या तीन खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. कदाचित देशात पहिल्यांदाच लोकसभेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या पक्षाच्या नेत्याचेच निलंबन करण्यात आलंय. कोणीही यांना प्रश्न विचारायचा नाही, मग हे प्रत्येकाल निलंबित करतील, असे म्हणत राघव चड्ढा यांनी व्हिडिओतून मोदी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केलाय. 

या देशात प्रिव्हीलेज कमिटीने इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग यांच्याविरुद्ध कारवाई केली. भाजपावाले ज्याप्रमाणे राहुल गांधींची सदस्यता काढू शकतात, तसेच आम आदमी पक्षाचीही सदस्यता काढतील. मात्र, मी शेवटपर्यंत यांच्याशी लढेल, सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, देख ना है जोर कितना बाजू ए कातिल मै है... असे म्हणत मीही शहीद भगतसिंगांच्या भूमितला आहे, असा इशाराच राघव चड्ढा यांनी भाजपा नेत्यांना दिला आहे. 

टॅग्स :AAPआपBJPभाजपाMember of parliamentखासदार