शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

'2019 मधील लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध संपुर्ण देश अशी असेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 13:26 IST

'देशात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असून लोकांना आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड करण्यास तयार नाहीत. 2019 मध्ये कोणतेही पक्ष नाही तर लोकच लढणार आहेत', असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत

ठळक मुद्देअरविंद केजरीवाल, यशवंत सिन्हा आणि मनिष तिवारी एकाच मंचावर आले होतेमनिष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तिन्ही नेते एकत्र आले होते पुढील लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरोधात संपुर्ण देश अशी होईल असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांच्यासोबत एकाच मंचावर आले होते. मनिष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तिन्ही नेते एकत्र आले होते. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी पुढील लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरोधात संपुर्ण देश अशी होईल असं सांगितलं. 

'देशात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असून लोकांना आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड करण्यास तयार नाहीत. 2019 मध्ये कोणतेही पक्ष नाही तर लोकच लढणार आहेत', असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी यशवंत सिन्हा यांच्याकडे इशारा करत सांगितलं की, 'युद्ध तुमचे नेता, तुमचे वरिष्ठे नेता आणि लोकांमध्ये होणार आहे'. 'विरोधक एकत्र येवो अथवा न येवोत, हे अंकांचं गणित आहे जे राजकारणात गरजेचं आहे. पण जे लोकांमध्ये सुरु आहे ते मी सांगू शकतो. लोक एकवेळचं अन्न त्यागू शकतात, मात्र आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड करु शकत नाहीत', असं अरविंद केजरीवाल बोलले. 

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'देशात इतकं भीतीचं वातावरण आहे, ज्याची कल्पना तुम्ही करु शकत नाही. आणि हे मी म्हणत नाही, मुस्लिम आणि ख्रिश्चनांमधली भीतीच सांगत आहे. ही भीती व्यापारी, व्यवसायिक आणि स्टॉक मार्केटमध्येही आहे. अशा परिस्थिती देश कसा चालेल ? पुढील निवडणूक विरोधक विरुद्ध भाजपा नाही, तर भाजपाविरुद्ध संपुर्ण देश अशी असेल'. पुढे ते बोलले की, 'असं वाटतं संपुर्ण देशावर नजर ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे व्यापारी घाबरले आहेत'. अरविंद केजरीवाल यांनी यशवंत सिन्हा यांचं कौतुक करताना, त्यांनी कोसळत असलेल्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करण्याची हिंमत दाखवली असं म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याला उत्तर देताना यशवंत सिन्हा बोलले की, 'मी भीष्म आहे. द्रोपदीचं वस्त्रहरण होत असताना भीष्म शांत बसले होते. पण मी शांत बसणार नाही. अर्थव्यवस्थेचं वस्त्रहरण होत असताना मी शांत बसणार नाही'.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी