शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

'2019 मधील लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध संपुर्ण देश अशी असेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 13:26 IST

'देशात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असून लोकांना आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड करण्यास तयार नाहीत. 2019 मध्ये कोणतेही पक्ष नाही तर लोकच लढणार आहेत', असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत

ठळक मुद्देअरविंद केजरीवाल, यशवंत सिन्हा आणि मनिष तिवारी एकाच मंचावर आले होतेमनिष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तिन्ही नेते एकत्र आले होते पुढील लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरोधात संपुर्ण देश अशी होईल असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांच्यासोबत एकाच मंचावर आले होते. मनिष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तिन्ही नेते एकत्र आले होते. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी पुढील लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरोधात संपुर्ण देश अशी होईल असं सांगितलं. 

'देशात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असून लोकांना आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड करण्यास तयार नाहीत. 2019 मध्ये कोणतेही पक्ष नाही तर लोकच लढणार आहेत', असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी यशवंत सिन्हा यांच्याकडे इशारा करत सांगितलं की, 'युद्ध तुमचे नेता, तुमचे वरिष्ठे नेता आणि लोकांमध्ये होणार आहे'. 'विरोधक एकत्र येवो अथवा न येवोत, हे अंकांचं गणित आहे जे राजकारणात गरजेचं आहे. पण जे लोकांमध्ये सुरु आहे ते मी सांगू शकतो. लोक एकवेळचं अन्न त्यागू शकतात, मात्र आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड करु शकत नाहीत', असं अरविंद केजरीवाल बोलले. 

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'देशात इतकं भीतीचं वातावरण आहे, ज्याची कल्पना तुम्ही करु शकत नाही. आणि हे मी म्हणत नाही, मुस्लिम आणि ख्रिश्चनांमधली भीतीच सांगत आहे. ही भीती व्यापारी, व्यवसायिक आणि स्टॉक मार्केटमध्येही आहे. अशा परिस्थिती देश कसा चालेल ? पुढील निवडणूक विरोधक विरुद्ध भाजपा नाही, तर भाजपाविरुद्ध संपुर्ण देश अशी असेल'. पुढे ते बोलले की, 'असं वाटतं संपुर्ण देशावर नजर ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे व्यापारी घाबरले आहेत'. अरविंद केजरीवाल यांनी यशवंत सिन्हा यांचं कौतुक करताना, त्यांनी कोसळत असलेल्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करण्याची हिंमत दाखवली असं म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याला उत्तर देताना यशवंत सिन्हा बोलले की, 'मी भीष्म आहे. द्रोपदीचं वस्त्रहरण होत असताना भीष्म शांत बसले होते. पण मी शांत बसणार नाही. अर्थव्यवस्थेचं वस्त्रहरण होत असताना मी शांत बसणार नाही'.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी