शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 05:33 IST

न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्या. आर. महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला. १८ जून २०१४ रोजी एन. एस. रवीश या व्यक्तीचा कर्नाटकातील मल्लासांद्रा येथून कारने निघाल्यावर अपघातात मृत्यू झाला होता.

नवी दिल्ली : बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने झालेल्या अपघातात मृताच्या वारसांना भरपाई देण्यास विमा कंपन्या बांधील नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.

न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्या. आर. महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला. १८ जून २०१४ रोजी एन. एस. रवीश या व्यक्तीचा कर्नाटकातील मल्लासांद्रा येथून कारने निघाल्यावर अपघातात मृत्यू झाला होता. अत्यंत वेगात असलेली ही कार नियंत्रण सुटल्यामुळे उलटली होती. यात रवीशचा मृत्यू झाला होता. याच कारमध्ये त्याचे वडील, बहीण व मुलेही होती.

उच्च न्यायालय म्हणाले होते, दावा करता येणार नाही

हा अपघात बेजबाबदारपणे कार चालवल्याने झाला. चालकाने वाहतूक नियमांचेही पालन केले नाही. या अपघातास चालकच जबाबदार होता. त्यामुळे त्याचे उत्तराधिकारी कोणत्याही भरपाईचा दावा करू शकत नाहीत. असा दावा मंजूर केला तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या चुकीच्या कार्यासाठीही भरपाई मिळू शकते, असा संदेश जाईल.

फेटाळला होता दावा

या अपघातानंतर विमा कंपनीने रवीश यांच्या कुटुंबीयांनी केलेला अपघात विम्याच्या भरपाईचा ८० लाख रुपयांचा दावा कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला होता. न्यायालयाने हा निकाल देताना बेजबाबदारपणे कार चालवल्याने अपघात झाल्याचे निरीक्षण पुराव्याआधारे नोंदवले होते. या निकालात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिला.