शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 05:33 IST

न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्या. आर. महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला. १८ जून २०१४ रोजी एन. एस. रवीश या व्यक्तीचा कर्नाटकातील मल्लासांद्रा येथून कारने निघाल्यावर अपघातात मृत्यू झाला होता.

नवी दिल्ली : बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने झालेल्या अपघातात मृताच्या वारसांना भरपाई देण्यास विमा कंपन्या बांधील नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.

न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्या. आर. महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला. १८ जून २०१४ रोजी एन. एस. रवीश या व्यक्तीचा कर्नाटकातील मल्लासांद्रा येथून कारने निघाल्यावर अपघातात मृत्यू झाला होता. अत्यंत वेगात असलेली ही कार नियंत्रण सुटल्यामुळे उलटली होती. यात रवीशचा मृत्यू झाला होता. याच कारमध्ये त्याचे वडील, बहीण व मुलेही होती.

उच्च न्यायालय म्हणाले होते, दावा करता येणार नाही

हा अपघात बेजबाबदारपणे कार चालवल्याने झाला. चालकाने वाहतूक नियमांचेही पालन केले नाही. या अपघातास चालकच जबाबदार होता. त्यामुळे त्याचे उत्तराधिकारी कोणत्याही भरपाईचा दावा करू शकत नाहीत. असा दावा मंजूर केला तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या चुकीच्या कार्यासाठीही भरपाई मिळू शकते, असा संदेश जाईल.

फेटाळला होता दावा

या अपघातानंतर विमा कंपनीने रवीश यांच्या कुटुंबीयांनी केलेला अपघात विम्याच्या भरपाईचा ८० लाख रुपयांचा दावा कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला होता. न्यायालयाने हा निकाल देताना बेजबाबदारपणे कार चालवल्याने अपघात झाल्याचे निरीक्षण पुराव्याआधारे नोंदवले होते. या निकालात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानेही नकार दिला.