चर्चेची मागणीच केली नाही -रविशंकर
By Admin | Updated: February 28, 2015 01:02 IST2015-02-28T01:02:37+5:302015-02-28T01:02:37+5:30
राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्ष व समाजवादी या शब्दांवर चर्चा करण्याची गरज असल्याचे मी कधीही म्हटलेले नाही़

चर्चेची मागणीच केली नाही -रविशंकर
नवी दिल्ली : राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्ष व समाजवादी या शब्दांवर चर्चा करण्याची गरज असल्याचे मी कधीही म्हटलेले नाही़ सरकारचाही असा कुठलाही इरादा नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली़
प्रसाद म्हणाले की, मी कधीही धर्मनिरपेक्ष व समाजवादी या शब्दांवर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी केलेली नाही़ तथ्य जाणून न घेता, माझ्याविरुद्ध आरोप ठेवण्यात आले.