जळगावात पाणीटंचाई नाही
By Admin | Updated: April 12, 2016 00:37 IST2016-04-12T00:37:56+5:302016-04-12T00:37:56+5:30
सुशील देवकर

जळगावात पाणीटंचाई नाही
स शील देवकरजळगाव- शहरासाठी माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या द्रष्टेपणामुळे वाघूर धरणातून पाणीपुरवठा योजना करण्यात आलेली आहे. वाघूर धरणात आजच्या तारखेला शहराला आणखी किमान वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरात पाणीटंचाईची स्थिती नाही. मात्र शहरात पूर्वीपासूनच दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मनपाच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र पाणीटंचाईची स्थिती असली तरीही शहराला पाणीपुरवठा करणार्या वाघूर धरणात आणखी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा असल्याने टंचाईची भीती नाही. मात्र नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. नासाडी करू नये.-नितीन ला, महापौर