शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कावेरी वादावर हिंसाचार नको

By admin | Updated: September 16, 2016 02:08 IST

कावेरी जलविवादावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे.

नवी दिल्ली : कावेरी जलविवादावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे. राज्यांनी न्यायालयाच्या आदेशाला बांधील राहायलाच हवे असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कर्नाटक आणि तामिळनाडू सरकारला धारेवर धरले. हिंसात्मक आंदोलनाने कोणताही उद्देश साध्य होणार नसून झळ पोहोचलेले लोक कायदेशीर मार्ग अवलंबण्यास मोकळे आहेत, असेही न्या. दीपक मिश्रा आणि यू.यू. ललित यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.लोक कायदा हाती घेऊ शकत नाहीत. दोन्ही राज्यांनी कावेरी जलविवादासंबंधी आदेशानंतर कोणताही हिंसाचार, आंदोलन किंवा संपत्तीचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. संपत्तीचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेणे हे तामिळनाडू आणि कर्नाटकचे कर्तव्यच आहे. कायदा व सुव्यवस्था, शांतता आणि प्रतिष्ठा राखावी. दोन्ही राज्यांचे सक्षम प्राधिकरण शांतता कायम राखण्यात यशस्वी होईल अशी आम्हाला आशा आहे. न्यायालय आदेश देईल तेव्हा कोणताही हिंसाचार व्हायला नको. कुणाचेही नुकसान झाल्यास त्यांना तक्रारींचा निपटारा करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याची मुभा राहील. बंद किंवा हिंसात्मक आंदोलन होत असल्यास त्याला अटकाव घालण्याची जबाबदारी दोन्ही राज्यांची आहे. आंदोलन किंवा हिंसाचार किंवा संपत्तीचे नुकसान होत असल्यास सर्वोच्च न्यायालयाने २००९ च्या आदेशानुसार मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत, असे खंडपीठाने नमूद केले.२० सप्टेंबर रोजी सुनावणी...आंदोलनादरम्यान सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी दोन्ही राज्य सरकारांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने २० सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित केली आहे. कर्नाटकमध्ये शुक्रवारी रेल रोको होत असून तामिळनाडूतही आंदोलन केले जात आहे, याकडे याचिकाकर्ते पी. शिवकुमार यांचे वकील आदीश अगरवाल यांनी लक्ष वेधले. दोन्ही राज्यांमधील आंदोलनामुळे आपले नुकसान झाल्याचा दावा तामिळनाडूतील कन्याकुमारीचे रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार यांनी केला आहे.---------------------------