शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

कावेरी वादावर हिंसाचार नको

By admin | Updated: September 16, 2016 02:08 IST

कावेरी जलविवादावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे.

नवी दिल्ली : कावेरी जलविवादावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे. राज्यांनी न्यायालयाच्या आदेशाला बांधील राहायलाच हवे असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कर्नाटक आणि तामिळनाडू सरकारला धारेवर धरले. हिंसात्मक आंदोलनाने कोणताही उद्देश साध्य होणार नसून झळ पोहोचलेले लोक कायदेशीर मार्ग अवलंबण्यास मोकळे आहेत, असेही न्या. दीपक मिश्रा आणि यू.यू. ललित यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.लोक कायदा हाती घेऊ शकत नाहीत. दोन्ही राज्यांनी कावेरी जलविवादासंबंधी आदेशानंतर कोणताही हिंसाचार, आंदोलन किंवा संपत्तीचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. संपत्तीचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेणे हे तामिळनाडू आणि कर्नाटकचे कर्तव्यच आहे. कायदा व सुव्यवस्था, शांतता आणि प्रतिष्ठा राखावी. दोन्ही राज्यांचे सक्षम प्राधिकरण शांतता कायम राखण्यात यशस्वी होईल अशी आम्हाला आशा आहे. न्यायालय आदेश देईल तेव्हा कोणताही हिंसाचार व्हायला नको. कुणाचेही नुकसान झाल्यास त्यांना तक्रारींचा निपटारा करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याची मुभा राहील. बंद किंवा हिंसात्मक आंदोलन होत असल्यास त्याला अटकाव घालण्याची जबाबदारी दोन्ही राज्यांची आहे. आंदोलन किंवा हिंसाचार किंवा संपत्तीचे नुकसान होत असल्यास सर्वोच्च न्यायालयाने २००९ च्या आदेशानुसार मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत, असे खंडपीठाने नमूद केले.२० सप्टेंबर रोजी सुनावणी...आंदोलनादरम्यान सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी दोन्ही राज्य सरकारांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने २० सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित केली आहे. कर्नाटकमध्ये शुक्रवारी रेल रोको होत असून तामिळनाडूतही आंदोलन केले जात आहे, याकडे याचिकाकर्ते पी. शिवकुमार यांचे वकील आदीश अगरवाल यांनी लक्ष वेधले. दोन्ही राज्यांमधील आंदोलनामुळे आपले नुकसान झाल्याचा दावा तामिळनाडूतील कन्याकुमारीचे रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार यांनी केला आहे.---------------------------