भूसंपादनाबाबत माघार नाहीच
By Admin | Updated: February 27, 2015 01:51 IST2015-02-27T01:51:27+5:302015-02-27T01:51:27+5:30
भूसंपादनासह कोणत्याही विधेयकावर माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संसदेत त्यावर चर्चा व्हावी आणि त्यानंतर निर्णय घेतला जावा.

भूसंपादनाबाबत माघार नाहीच
नवी दिल्ली : भूसंपादनासह कोणत्याही विधेयकावर माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संसदेत त्यावर चर्चा व्हावी आणि त्यानंतर निर्णय घेतला जावा. अर्थसंकल्पानंतर विधेयके मांडली जातील, त्यावर सर्व सूचनांवर खुलेपणाने विचार केला जाईल, असे संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले. या मुद्यावर काँग्रेसची दुटप्पी भूमिका असल्याचे ते म्हणाले.
उपाययोजना पुढे नेण्यात सरकारला कोणताही प्रश्न नाही. मित्र आणि समर्थक पक्ष त्यावर विचार करतील. कोणताही वटहुकूम मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग ते कोळसा विधेयक असो, की खाण, खनिज किंवा ई-रिक्षासंबंधी वटहुकूम असो. या सर्व वटहुकमांवर संसदेत चर्चा घडवून आणली जाईल आणि निर्णय होईल, असे ते म्हणाले.
भूसंपादन वटहुकमाबाबत काँग्रेसचे आंदोलन हे पराभूतांनी अस्तित्वासाठी चालवलेले आंदोलन आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा त्यामागे उद्देश नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग म्हणाले.