शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

आसाममध्ये यावेळी मोदी लाट नाही -बद्रुद्दीन अजमल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 06:55 IST

बद्रुद्दीन अजमल म्हणाले, “आसाममध्ये भाजपचा पराभव होईल आणि त्यामुळे देशासाठी आसाममधील निवडणूक निर्णायक वळण देणारी ठरेल. हे घडण्यासाठी महाआघाडी जोरदार प्रयत्न करीत आहे.

नवी दिल्ली : आसाममध्ये २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मोदी लाट’ होती. ती यावेळी नाही, असे ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययूडीएफ) अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी रविवारी म्हटले. भारतीय जनता पक्ष माझ्याकडे बोट दाखवून आणि मुस्लिमांना शत्रूच्या ठिकाणी दाखवून हिंदूंची मते एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून अजमल म्हणाले,  या प्रयत्नांत त्याला यश येणार नाही. (There is no Modi wave in Assam this time - Badruddin Ajmal)

एआययूडीएफवर जातिवाद केला जात असलेला आरोप निराधार असल्याचे सांगून अजमल यांनी आसाममध्ये माझ्या या पक्षापेक्षा कोणतीही संघटना जास्त धर्मनिरपेक्ष नाही, असा दावा केला. गेल्या निवडणुकीत एआयडीयूएफने मुस्लिमेंतरांना लक्षणीय असे प्रतिनिधित्व दिल्याचा उल्लेख त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला.बद्रुद्दीन अजमल म्हणाले, “आसाममध्ये भाजपचा पराभव होईल आणि त्यामुळे देशासाठी आसाममधील निवडणूक निर्णायक वळण देणारी ठरेल. हे घडण्यासाठी महाआघाडी जोरदार प्रयत्न करीत आहे. या महाआघाडीत आम्ही आणि काँग्रेस आहोत.” पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुड्डुचेरीत भाजपचा पराभव होईल. यातून संपूर्ण देशात संदेश जाईल,  असे सांगून अजमल यांनी ‘धर्मनिरपेक्ष शक्ती’ विजयी होतील, असा आत्मविश्वास व्यक्त केला. एआययूडीएफ धर्मनिरपेक्ष असून तसाच राहील; परंतु भाजप हा स्वत:च जातीय असून तो जातीय राजकारण करतो व याच चष्म्यातून तो सगळ्यांकडे बघतो, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१ElectionनिवडणूकBJPभाजपा