शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

घटना घडून गेल्यावर आम्ही फारसे काही करू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 06:18 IST

एखादी घटना घडू नये यासाठी आम्ही आदेश देऊ शकत नाही किंवा घटना घडून गेल्यावरही फारसे काही करू शकत नाही,

नवी दिल्ली : एखादी घटना घडू नये यासाठी आम्ही आदेश देऊ शकत नाही किंवा घटना घडून गेल्यावरही फारसे काही करू शकत नाही, असे सांगत ईशान्य दिल्लीतील दंगलींसारख्या विषयांशी संबंधित याचिकांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आपल्या मर्यादा स्पष्ट केल्या.कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा व अभय वर्मा या भाजप नेत्यांविरुद्ध प्रक्षोभक भाषणे केल्याबद्दल गुन्हे नोंदवावे यासाठी ईशान्य दिल्लीतील ताज्या दंगलीतील पीडितांनी याचिका केली आहे. न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंती ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी केली. त्यानुसार सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने येत्या बुधवारी सुनावणी घेण्याचे मान्य केले.गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयातही अशाच प्रकारची याचिका करण्यात आली होती. सुरुवातीस न्यायालयाने पोलिसांना फैलावर घेऊन प्रक्षोभक भाषणांचे व्हिडिओ पाहून गुन्हे नोंदविण्याबाबत २४ तासांत निर्णय घ्यावा, असे सांगितले. मात्र, नंतर खंडपीठावरील न्यायाधीश बदलले. त्यांनी ‘गुन्हे नोंदविण्यास सध्याची वेळ अनुकूल नाही’ हे केंद्र सरकारचे म्हणणे मान्य करून सुनावणी १३ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती.>दबाव हाताळणे कठीणअशा प्रकरणात न्यायालय कुठवर व कशाप्रकारे हस्तक्षेप करू शकते यालाही मर्यादा असतात, असे न्यायमूर्तींनी सांगितले. सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले की, शहरात शांतता नांदावी, कोणाचेही प्राण हकनाक जाऊ नयेत, असे आम्हालाही वाटते.एखादी घटना घडू नये यासाठी आम्ही आदेश देऊ शकत नाही व एकदा घटना घडून गेल्यावर फारसे काही करताही येत नाही. जणू काही याला न्यायालयच जबाबदार आहे, अशा प्रकारचे लिखाण आम्ही वृत्तपत्रांतून वाचतो आणि आमच्यावर एक प्रकारचा दबाब येतो. तो हाताळणे कठीण होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय