शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 03:12 IST

दाेन्ही देशांकडे असलेले अणुबाॅम्ब आणि त्याचा संभाव्य परिणाम पाहता झालेला निर्णय दाेन्ही देशाच्या दृष्टीने चांगला आहे.

डाॅ. हर्षद भाेसले, अभ्यासक, आंतरराष्ट्रीय संबंध

भारत-पाकिस्तानमध्ये आताची तणावाची स्थिती ही १९९०नंतरच्या स्थितीशी तुलना करता अधिक भीषण आहे. मुळात यावेळी युद्ध झालेलेच नाही, पण चित्र असे निर्माण केले गेले की, भारत - पाकिस्तानमध्ये प्रत्यक्ष युद्धच सुरू झालेले आहे. पहलगाम घटनेनंतर निर्माण झालेली तणावाची स्थिती आटाेक्यात आणण्याचा प्रयत्न दाेन्ही देशांनी केला आहे. 

युद्ध थांबले, याचे श्रेय भारत - पाकिस्तान या दाेन्ही देशातील राजनैतिक प्रयत्नांना द्यावे लागेल. यात अमेरिकेचा काहीएक संबंध नाही. आजच्या तणावपूर्ण स्थितीचा संबंध जर आपण आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण याच्याशी लावला तर युद्ध झाल्यास फार माेठ्या परिणामाला सामोरे जावे लागेल. हे दाेन्ही देशांनी ओळखल्यामुळे कदाचित तणाव कमी करायचे ठरवले. यालाच आपल्याकडे शस्त्रसंधी समजली गेली. 

माझ्या मते ही शस्त्रसंधी नसून, डीएस्केलेशन आहे. संघर्षमयी वातावरण स्वत: हाेऊन कमी करण्याचे दाेन्ही देशांच्या धुरिणांनी मान्य केलेले आहे. युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधी हाेण्याचा प्रश्नच येत नाही. येणाऱ्या काळातील राजकीय अर्थकारणाचा विचार करून हा निर्णय झालेला दिसताे. दाेन्ही देशांकडे असलेले अणुबाॅम्ब आणि त्याचा संभाव्य परिणाम पाहता झालेला निर्णय दाेन्ही देशाच्या दृष्टीने चांगला आहे.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक