शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कॉम्प्युटरवर पाळत ठेवण्याचे त्या संस्थांना पूर्णाधिकार नाहीत, सरकारचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 06:12 IST

विरोधकांनी चढवलेल्या जोरादार हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आठवडाभरापूर्वी जारी केलेल्या अधिसूचनेबाबत खुलासा केला आहे.

नवी दिल्ली : विरोधकांनी चढवलेल्या जोरादार हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आठवडाभरापूर्वी जारी केलेल्या अधिसूचनेबाबत खुलासा केला आहे. कोणाचाही संगणक, मोबाईल, फोनवर पाळत ठेवून त्यातील माहिती हस्तगत करून त्यातील संभाषण वा माहिती तपासण्याचे सरसकट अधिकार दहा तपास संस्थांना देण्यात आलेले नाहीत. यासाठी या तपास संस्थांना केंद्रीय गृहसचिव किंवा राज्यांचे गृहसचिव यासारख्या सक्षम प्राधिकरणाकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, असे सरकारने खुलासा करताना स्पष्ट केले आहे.गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अशा कारवाईत सध्या अस्तित्वात असलेले नियम, कायद्याचे या तपास संस्थांना पालन करावे लागेल.नवीन संस्था वा कोणालाही पूर्ण अधिकार देण्यासारखे काहीही नाही. हा नियम, कायदा जुनाच असून, संस्थाही त्याच आहेत. यासंबंधीच्या सध्या अस्तित्वात असलेला नियम, कायदा जशाचा तसाच आहे. यातील स्वल्पविराम किंवा पूर्णविराम चिन्हांतही बदल करण्यात आलेला नाही. (वृत्तसंस्था)नव्या आदेशात देखरेख करणाºया संस्थांची नावेकॉम्प्युटरमधील माहिती हस्तगत करून त्याबाबत माहिती घेणे आणि त्यावर देखरेख ठेवण्याचा नियम २००९ मध्येच करण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार होते. नव्या आदेशात फक्त देखरेख करणाºया संस्थांची नावे देण्यात आली. ही अधिसूचना म्हणजे दूरसंचार सेवा देणाºया कंपन्यांना पाठविण्यात आलेली यादी आहे. फक्त अधिकृत आणि विशेष संस्थांनाच संभाषण, संदेश वा संप्रेषण हस्तगत करून तपासणी करण्याचे अधिकार पूर्वीच देण्यात आलेले आहेत. जेणेकरून अनधिकृत संस्था/अनधिकृत दूरसंचार सेवाप्रदात्यांकडून दुरुपयोग होऊ नये.

टॅग्स :Governmentसरकार