शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
2
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
3
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
4
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
5
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
6
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
7
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
8
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
9
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
10
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
11
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
12
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
13
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
14
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
15
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
16
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
17
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
18
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
19
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
20
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 

कॉम्प्युटरवर पाळत ठेवण्याचे त्या संस्थांना पूर्णाधिकार नाहीत, सरकारचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 06:12 IST

विरोधकांनी चढवलेल्या जोरादार हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आठवडाभरापूर्वी जारी केलेल्या अधिसूचनेबाबत खुलासा केला आहे.

नवी दिल्ली : विरोधकांनी चढवलेल्या जोरादार हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आठवडाभरापूर्वी जारी केलेल्या अधिसूचनेबाबत खुलासा केला आहे. कोणाचाही संगणक, मोबाईल, फोनवर पाळत ठेवून त्यातील माहिती हस्तगत करून त्यातील संभाषण वा माहिती तपासण्याचे सरसकट अधिकार दहा तपास संस्थांना देण्यात आलेले नाहीत. यासाठी या तपास संस्थांना केंद्रीय गृहसचिव किंवा राज्यांचे गृहसचिव यासारख्या सक्षम प्राधिकरणाकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, असे सरकारने खुलासा करताना स्पष्ट केले आहे.गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अशा कारवाईत सध्या अस्तित्वात असलेले नियम, कायद्याचे या तपास संस्थांना पालन करावे लागेल.नवीन संस्था वा कोणालाही पूर्ण अधिकार देण्यासारखे काहीही नाही. हा नियम, कायदा जुनाच असून, संस्थाही त्याच आहेत. यासंबंधीच्या सध्या अस्तित्वात असलेला नियम, कायदा जशाचा तसाच आहे. यातील स्वल्पविराम किंवा पूर्णविराम चिन्हांतही बदल करण्यात आलेला नाही. (वृत्तसंस्था)नव्या आदेशात देखरेख करणाºया संस्थांची नावेकॉम्प्युटरमधील माहिती हस्तगत करून त्याबाबत माहिती घेणे आणि त्यावर देखरेख ठेवण्याचा नियम २००९ मध्येच करण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार होते. नव्या आदेशात फक्त देखरेख करणाºया संस्थांची नावे देण्यात आली. ही अधिसूचना म्हणजे दूरसंचार सेवा देणाºया कंपन्यांना पाठविण्यात आलेली यादी आहे. फक्त अधिकृत आणि विशेष संस्थांनाच संभाषण, संदेश वा संप्रेषण हस्तगत करून तपासणी करण्याचे अधिकार पूर्वीच देण्यात आलेले आहेत. जेणेकरून अनधिकृत संस्था/अनधिकृत दूरसंचार सेवाप्रदात्यांकडून दुरुपयोग होऊ नये.

टॅग्स :Governmentसरकार