शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

...मग प्रत्येक भारतीयावर ₹ 4,80,000 कर्ज कशाचे? RBI चा रिपोर्टवर काँग्रेसचे बोट, मोदी सरकारवर चढवला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:46 IST

Per Person Debt in India 2025: मागील दोन वर्षात प्रत्येक भारतीयावर असलेले कर्ज पाच लाखांच्या घरात गेलं आहे. दोन वर्षात प्रत्येक भारतीयावर ९० हजारांनी वाढले आहे.. आरबीआयच्या नव्या रिपोर्टने राजकारण तापलं आहे.  

RBI Report per Capita Debt: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या रिपोर्टने खळबळ उडाली आहे. मागील दोन वर्षात प्रत्येक भारतीयावरील भांडवली कर्जात प्रचंड वाढ झाली असून, ते ९० हजारांने वाढून ४.८ लाखांच्या घरात गेले आहे. यावरूनच काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला चढवला. 'सगळे सरकारी प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा खासगी भागीदारीतून होत आहेत, तर मग देशावर हे कर्ज का वाढत चालले आहे? देशातील प्रत्येक नागरिकावर ४,८०,००० हजारांचे कर्ज का झाले आहे?, असा सवाल काँग्रेसने मोदी सरकारला केला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी आरबीआयच्या अहवालातील आकडेवारीवर बोट ठेवत काही मुद्दे उपस्थित केले आहेत. 

जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, "अच्छे दिनचे कर्ज. मोदी सरकारने मागील ११ वर्षाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. लोकांचे आयुष्य सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. फक्त उद्योगपती मित्रांसाठी धोरणे बनवली गेली. त्यातून झालेले नुकसान देशातील जनतेला सोसावे लागत आहेत. हे सत्य कुठल्या न कुठल्या प्रकारे दररोज आपल्यासमोर येत आहे."

मोदीराजमध्ये देशातील कर्जाचे ओझे वाढले

"रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चिंता वाढवणारे चित्र समोर आले आहे. सरकारकडून आकड्यांचा खेळ आणि तज्ज्ञाची मदत घेऊन मूळ उणीवा लपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही की, देशावरील कर्जाचे ओझे मोदीराजमध्ये उच्चांकी पातळीवर गेले आहे", असे रमेश यांनी म्हटले आहे.    रमेश यांनी रिपोर्टमधील काही मुद्देही मांडले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, "२ वर्षात प्रत्येक व्यक्तीवरील कर्ज ९० हजारांनी वाढून ४.८ लाख झाले आहे. हातात येणाऱ्या कमाईतील २५.७ टक्के पैसे फक्त कर्ज फेडण्यात चालले आहेत. सर्वात जास्त ५५ टक्के कर्ज कथित क्रेडिट कार्ड, मोबाईल ईएमआय याच्यासाठी जात आहे. याचा अर्थ महागाईमुळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होत नाहीये आणि कर्ज घेण्याची नामुष्की त्यांच्यावर येत आहे", असे जयराम रमेश म्हणाले. 

वाचा >>प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा

"तरुणांना नोकऱ्या नाही. शेतकरी आत्महत्या करत आहे. जनता महागाईने त्रस्त आहे. संवैधानिक संस्थांना चिरडले जात आहे. जनता कर्जात बुडत चालली आहे आणि मोदीजींचे प्रिय मित्र नफा कमवत आहेत. त्यांची संपत्ती वाढतच चालली आहे", अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार