शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
2
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
3
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
4
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
5
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
6
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
7
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
8
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
9
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
10
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
11
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
12
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव
13
Platinum Investment: सोने-चांदीच्या किंमती आवाक्याबाहेर, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे का?
14
Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकीलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
15
Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
16
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
17
Virat Kohli: "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
18
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
19
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
20
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...

...मग प्रत्येक भारतीयावर ₹ 4,80,000 कर्ज कशाचे? RBI चा रिपोर्टवर काँग्रेसचे बोट, मोदी सरकारवर चढवला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:46 IST

Per Person Debt in India 2025: मागील दोन वर्षात प्रत्येक भारतीयावर असलेले कर्ज पाच लाखांच्या घरात गेलं आहे. दोन वर्षात प्रत्येक भारतीयावर ९० हजारांनी वाढले आहे.. आरबीआयच्या नव्या रिपोर्टने राजकारण तापलं आहे.  

RBI Report per Capita Debt: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या रिपोर्टने खळबळ उडाली आहे. मागील दोन वर्षात प्रत्येक भारतीयावरील भांडवली कर्जात प्रचंड वाढ झाली असून, ते ९० हजारांने वाढून ४.८ लाखांच्या घरात गेले आहे. यावरूनच काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला चढवला. 'सगळे सरकारी प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा खासगी भागीदारीतून होत आहेत, तर मग देशावर हे कर्ज का वाढत चालले आहे? देशातील प्रत्येक नागरिकावर ४,८०,००० हजारांचे कर्ज का झाले आहे?, असा सवाल काँग्रेसने मोदी सरकारला केला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी आरबीआयच्या अहवालातील आकडेवारीवर बोट ठेवत काही मुद्दे उपस्थित केले आहेत. 

जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, "अच्छे दिनचे कर्ज. मोदी सरकारने मागील ११ वर्षाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. लोकांचे आयुष्य सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. फक्त उद्योगपती मित्रांसाठी धोरणे बनवली गेली. त्यातून झालेले नुकसान देशातील जनतेला सोसावे लागत आहेत. हे सत्य कुठल्या न कुठल्या प्रकारे दररोज आपल्यासमोर येत आहे."

मोदीराजमध्ये देशातील कर्जाचे ओझे वाढले

"रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चिंता वाढवणारे चित्र समोर आले आहे. सरकारकडून आकड्यांचा खेळ आणि तज्ज्ञाची मदत घेऊन मूळ उणीवा लपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही की, देशावरील कर्जाचे ओझे मोदीराजमध्ये उच्चांकी पातळीवर गेले आहे", असे रमेश यांनी म्हटले आहे.    रमेश यांनी रिपोर्टमधील काही मुद्देही मांडले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, "२ वर्षात प्रत्येक व्यक्तीवरील कर्ज ९० हजारांनी वाढून ४.८ लाख झाले आहे. हातात येणाऱ्या कमाईतील २५.७ टक्के पैसे फक्त कर्ज फेडण्यात चालले आहेत. सर्वात जास्त ५५ टक्के कर्ज कथित क्रेडिट कार्ड, मोबाईल ईएमआय याच्यासाठी जात आहे. याचा अर्थ महागाईमुळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होत नाहीये आणि कर्ज घेण्याची नामुष्की त्यांच्यावर येत आहे", असे जयराम रमेश म्हणाले. 

वाचा >>प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा

"तरुणांना नोकऱ्या नाही. शेतकरी आत्महत्या करत आहे. जनता महागाईने त्रस्त आहे. संवैधानिक संस्थांना चिरडले जात आहे. जनता कर्जात बुडत चालली आहे आणि मोदीजींचे प्रिय मित्र नफा कमवत आहेत. त्यांची संपत्ती वाढतच चालली आहे", अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार