शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"तेव्हा सत्ताधाऱ्यांना आपल्याच संस्कृतीची लाज वाटत होती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 09:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका; इतिहास पुसून प्रगती शक्य नाही

गुवाहाटी : ‘स्वातंत्र्यानंतर सत्तेत असलेल्या सत्ताधाऱ्यांना धार्मिक स्थळांचे महत्त्व समजले नाही आणि राजकीय कारणांमुळे त्यांना आपल्याच संस्कृतीची लाज वाटत होती,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे ११,६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी केली. 

मोदी म्हणाले की, कोणताही देश इतिहास पुसून प्रगती करू शकत नाही. तथापि, गेल्या दहा वर्षांत परिस्थिती बदलली आहे. सुरू केलेले प्रकल्प केवळ ईशान्येकडीलच नव्हे, तर उर्वरित दक्षिण आशियाशीही दळणवळण मजबूत करतील. गेल्या दहा वर्षांत आसाममध्ये शांतता परत आली आहे आणि ७,०००हून अधिक लोक शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात परतले आहेत. गेल्या दशकात विक्रमी संख्येने पर्यटकांनी या भागाला भेट दिली आहे.

‘असाममाला’ प्रकल्प नेमका काय आहे ?nपंतप्रधानांनी ‘असाममाला’ रस्त्यांच्या दुसऱ्या प्रकल्पाचेही लोकार्पण केले. nया टप्प्यात एकूण ३४४४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने ४३ नवीन रस्ते आणि ३८ काँक्रीट पूल बांधले जातील.

११,६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी यांनी खानापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात सुमारे ११,६०० कोटी रुपयांच्या राज्य आणि केंद्राच्या अनुदानित पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण केले. 

त्यामध्ये कामाख्या मंदिर कॉरिडॉर (४९८ कोटी रुपये), विमानतळ टर्मिनलपासून सहा पदरी रस्ता (३५८ कोटी), नेहरू स्टेडियममध्ये सुधारणा (८३१ कोटी) आणि चंद्रपूर येथे नवीन क्रीडा संकुलाचा (३०० कोटी) समावेश आहे.

विपश्यनेमुळे जीवनातील तणाव, समस्या दूर होतील nविपश्यना ही प्राचीन भारताची एक अनोखी देणगी तसेच आधुनिक विज्ञान आहे, ज्याद्वारे तरुण आणि वृद्ध लोकांना जीवनातील तणाव आणि समस्यांना तोंड देण्यासाठी मदत होऊ शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. nविपश्यना गुरू एस. एन. गोयंका यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांच्या डिजिटल भाषणात मोदी म्हणाले की, ध्यान आणि विपश्यना हे एकेकाळी त्यागाचे माध्यम म्हणून पाहिले जात होते; परंतु आता ते व्यावहारिक जीवनात व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम बनले आहे. विपश्यनेची शिकवण समस्यांवर उपाय शोधण्यात मदत करू शकते. विपश्यना हा आत्मनिरीक्षण ते आत्मपरिवर्तन असा प्रवास आहे आणि आजच्या सर्व आव्हानांवर उपाय आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा