शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

...तेव्हा मोदींनी केला होता मला फोन, दिला होता असा सल्ला, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उघड केलं गुपित   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 14:30 IST

D. Y, Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून दिलेल्या सल्ल्याची आठवण सांगितली आहे.

भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात असलेल्या आयुष समग्र कल्याण केंद्राचं उद्घाटन केलं. यादरम्यान, त्यांनी कोविडच्या साथीदरम्यान आपल्याला आलेल्या अनुभवाचा उल्लेख केला.  यादरम्यान, त्यांनी सांगितले की, कोरोनाचा फैलाव होऊ लागल्यापासून मी आयुषशी जोडला गेलो आहे. मला कोरोनाचा गंभीर संसर्ग झाला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन केला आणि तुम्ही लवकर बरे व्हाल, सर्व काही ठीक होईल, अशी मला अपेक्षा आहे, असे म्हणाले.  

चंद्रचूड पुढे  म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितले की, तुमची प्रकृती सध्या बरी नाही आहे, याची मला जाणीव आहे. मात्र आम्ही सर्व प्रयत्न करू. एक वैद्य आहेत जे आयुषमध्येही सचिव आहेत. मी त्यांच्याशी संपर्क साधण्याची व्यवस्था मी करतो. ते तुम्हाला औषध आमि इतर सर्व काही पाठवून देतील. 

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले की, जेव्हा मला कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हा मी आयुषमधून औषध घेतलं होतं. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा मला कोरोना झाला तेव्हा मी अजिबात अॅलोपॅथिक औषधं घेतली नाही. मात्र सद्यस्थितीत सर्व न्यायमूर्ती, त्यांचे कुटुंबीय आणि सर्वोच्च न्यायालयातील दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची मला चिंता वाटते, कारण त्यांना न्यायमूर्तींसारख्या सुविधा मिळत नाहीत.

ते म्हणाले की, त्यांच्याजवळ जीवनाचा समग्र पॅटर्न असावा, अशी मला अपेक्षा आहे. तसे मी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचेही आभार मानतो. मी योग करतो. मी शाकाहारी आहे. मागच्या पाच महिन्यांपासून मी शाकाहाराचं पालन केलं आहे. आता ते मी पुढे कायम ठेवणार आहे. मी जीवनामध्ये समग्र पॅटर्नवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करतो, असेही सरन्यायाधीशांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय