शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा मला विमानतळावरील खोलीत कोंडून ठेवलं, राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 18:56 IST

Rahul Gandhi News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घेतलेल्या मुलाखतीची सध्या चर्चा सुरू आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घेतलेल्या मुलाखतीची सध्या चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांनी या मुलाखतीमध्ये सत्यपाल मलिक यांच्यासोबत मोदी सरकार, पुलवामा हल्ला, शेतकरी आंदोलन, किमान हमीभाव, जातीय जनगणना आणि मणिपूर हिंसाचार आदी विषयांवर चर्चा केला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. याचवेळी राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्यावेळी त्यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेबाबतचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. 

सत्यपाल मलिक यांच्यासोबत पुलवामा हल्ल्याबाबत चर्चा करताना राहुल गांधी यांनी सांगितले की, मी हुतात्म्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा विमानतळावर पोहोचताच सुरक्षेचं कारण देत विमानतळावरील एका खोलीतच मला कोंडून ठेवण्यात आलं. मात्र त्यांनी याचं कारणही सांगितलं. 

या मुलाखतीवेळी सत्यपाल मलिक यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचं सरकार निवडून येणार नाही, असं आत्मविश्वासपूर्वक सांगितलं. राहुल गांधींनीही ही मुलाखत सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच ही मुलाखत ईडी-सीबीआयची पळापळ वाढवणार का? असा खोचक प्रश्न विचारला आहे.

राहुल गांधी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसेच या हल्ल्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. हा हल्ला रोखता आला असता, मात्र सरकारच्या बेफिकिरीमुळे हा हल्ला घडला, असा आरोप सत्यपाल मलिक यांनी पुन्हा केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार