शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 14:34 IST

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये 'जनता की अदालत' कार्यक्रमात अरविंद केजरीवालांनी हे वक्तव्य केले.

नवी दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी छत्रसाल स्टेडियमवर आयोजित जाहीर सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केजरीवालांनी डबल इंजिन सरकार म्हणजे दुहेरी लूट, अशी टीका केली. तसेच, पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांच्या कार्यकाळावरही प्रश्न उपस्थित केला. 'पंतप्रधान मोदींनी 22 राज्यांमध्ये वीज मोफत केली, तर मी स्वतः मोदींचा प्रचार करेन,' असा दावाही त्यांनी केला.

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये 'जनता की अदालत' कार्यक्रमाला संबोधित करताना अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिले. ते म्हणाले की, "या लोकांनी(BJP) 10 वर्षात काहीही केले नाही. PM मोदी पुढील वर्षी 75 वर्षांचे होतील, त्यामुळे निदान आतातरी त्यांनी काही काम करा. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी एनडीए शासित 22 राज्यांमध्ये मोफत वीज देण्याची घोषणा केली, तर मी स्वतः भाजपचा प्रचार करेन", असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल पुढे म्हणतात, "हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील भाजपच्या डबल इंजिन सरकारचा अंत होतोय. झारखंड आणि महाराष्ट्रातही तेच होणार आहे. डबल इंजिनचे सरकार म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार...हे सर्वसामान्य जनतेला समजले आहे. दिल्लीच्या निवडणुका येत आहेत. दिल्लीत आल्यानंतर ते (भाजप) म्हणतील की, डबल इंजिनचे सरकार बनवा. पण, यूपीमध्ये गेल्या 7 वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या जागा निम्म्या झाल्या. मणिपूरमध्ये 7 वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार आहे. दोन वर्षांपासून मणिपूर जळत आहे."

दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत केजरीवाल म्हणतात, "दिल्लीची सुरक्षा भाजपच्या ताब्यात आहे, पोलिस त्यांच्या पाठीशी आहेत, तरीही दिल्लीत गुन्ह्यांवर नियंत्रण का होत नाही? ते सुरक्षेची जबाबदारी सांभाळू शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी इतरांना कामे करू द्यावी. दिल्लीच्या बसमध्ये प्रवास करताना महिलांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते, हे मला माहीत आहे. त्यामुळेच आम्ही बसमध्ये मार्शल तैनात करण्यास सुरुवात केली. या बस मार्शलमुळे अनेक मोठे गुन्हे रोखले गेले आहेत आणि मुलांचे अपहरणही अयशस्वी केले."

"हे लोक गरीब विरोधी आहेत. गरीब कुटुंबातील 15,000 रुपये पगार घेणाऱ्या 10,000 बस मार्शलच्या नोकऱ्या काढून घेतल्या. हे लोक गरिबांच्या विरोधात काम करत आहेत. स्लिप बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले, गटार साफ करणाऱ्या 1,000 लोकांना कामावरुन काढले, विधवा, वृद्ध आणि डीटीसी कर्मचाऱ्यांचे पेन्शनही बंद करण्यात आले आहे. या लोकांना गरीबांची हाय नक्की लागणार," अशी बोचरी टीकाही केजरीवालांनी यावेळी केली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआपBJPभाजपा