शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 14:34 IST

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये 'जनता की अदालत' कार्यक्रमात अरविंद केजरीवालांनी हे वक्तव्य केले.

नवी दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी छत्रसाल स्टेडियमवर आयोजित जाहीर सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केजरीवालांनी डबल इंजिन सरकार म्हणजे दुहेरी लूट, अशी टीका केली. तसेच, पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांच्या कार्यकाळावरही प्रश्न उपस्थित केला. 'पंतप्रधान मोदींनी 22 राज्यांमध्ये वीज मोफत केली, तर मी स्वतः मोदींचा प्रचार करेन,' असा दावाही त्यांनी केला.

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये 'जनता की अदालत' कार्यक्रमाला संबोधित करताना अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिले. ते म्हणाले की, "या लोकांनी(BJP) 10 वर्षात काहीही केले नाही. PM मोदी पुढील वर्षी 75 वर्षांचे होतील, त्यामुळे निदान आतातरी त्यांनी काही काम करा. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी एनडीए शासित 22 राज्यांमध्ये मोफत वीज देण्याची घोषणा केली, तर मी स्वतः भाजपचा प्रचार करेन", असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल पुढे म्हणतात, "हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील भाजपच्या डबल इंजिन सरकारचा अंत होतोय. झारखंड आणि महाराष्ट्रातही तेच होणार आहे. डबल इंजिनचे सरकार म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार...हे सर्वसामान्य जनतेला समजले आहे. दिल्लीच्या निवडणुका येत आहेत. दिल्लीत आल्यानंतर ते (भाजप) म्हणतील की, डबल इंजिनचे सरकार बनवा. पण, यूपीमध्ये गेल्या 7 वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या जागा निम्म्या झाल्या. मणिपूरमध्ये 7 वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार आहे. दोन वर्षांपासून मणिपूर जळत आहे."

दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत केजरीवाल म्हणतात, "दिल्लीची सुरक्षा भाजपच्या ताब्यात आहे, पोलिस त्यांच्या पाठीशी आहेत, तरीही दिल्लीत गुन्ह्यांवर नियंत्रण का होत नाही? ते सुरक्षेची जबाबदारी सांभाळू शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी इतरांना कामे करू द्यावी. दिल्लीच्या बसमध्ये प्रवास करताना महिलांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते, हे मला माहीत आहे. त्यामुळेच आम्ही बसमध्ये मार्शल तैनात करण्यास सुरुवात केली. या बस मार्शलमुळे अनेक मोठे गुन्हे रोखले गेले आहेत आणि मुलांचे अपहरणही अयशस्वी केले."

"हे लोक गरीब विरोधी आहेत. गरीब कुटुंबातील 15,000 रुपये पगार घेणाऱ्या 10,000 बस मार्शलच्या नोकऱ्या काढून घेतल्या. हे लोक गरिबांच्या विरोधात काम करत आहेत. स्लिप बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले, गटार साफ करणाऱ्या 1,000 लोकांना कामावरुन काढले, विधवा, वृद्ध आणि डीटीसी कर्मचाऱ्यांचे पेन्शनही बंद करण्यात आले आहे. या लोकांना गरीबांची हाय नक्की लागणार," अशी बोचरी टीकाही केजरीवालांनी यावेळी केली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआपBJPभाजपा