शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

‘वरात, मंडप सारं तयार, पण नवरदेवाचा पत्ताच नाही’’, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरून आपची खोचक टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:10 IST

Delhi New Chief Minister: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला नसतानाही भाजपाकडून दिल्लीतील प्रसिद्ध रामलीला मैदानामध्ये शपथिविधीची तयारी करण्यात येत आहे. त्यावरून आम आदमी पक्षाने भाजपावर खोचक टीका केली आहे. वरात, मंडप सगळं काही तयार आहे. पण नवरदेवाचा पत्ताच नाही, असा टोला आपचे दिल्लीमधील प्रदेश संयोजक गोपाल राय यांनी लगावला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे उलटत आले तरी राज्यात नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. दिल्लीत आम आदमी पक्षाचा पराभव करत स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवल्यानंतरही भाजपालाआपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित करता आलेला नाही. असं असतानाही भाजपाकडून दिल्लीतील प्रसिद्ध रामलीला मैदानामध्ये शपथिविधीची तयारी करण्यात येत आहे. त्यावरून आम आदमी पक्षाने भाजपावर खोचक टीका केली आहे. वरात, मंडप सगळं काही तयार आहे. पण नवरदेवाचा पत्ताच नाही, असा टोला आपचे दिल्लीमधील प्रदेश संयोजक गोपाल राय यांनी लगावला आहे.

दिल्लामध्ये मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजपाला होत असलेल्या उशिरावरून टीका करताना गोपाल राय म्हणाले की, भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत आहे. वरात तयार आहे. मंडपही तयार आहे. मात्र नवरदेव कोण असेल हेच भाजपाला ठरवता येत नाही आहे.

गोपाल राय पुढे म्हणाले की, भाजपा सारं काही करत आहे. मात्र त्यांना मुख्यमंत्री ठरवता येत नाही आहे. आतापर्यंत भाजपाने आपल्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावलेली नाही. हे भाजपावाले पुढच्या पाच वर्षांत आणखी काही विक्रम रचतील. भाजपा अंतर्गत चढाओढ लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. आता दिल्लीच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता भाजपाने केली पाहिजेत, असा टोलाही गोपाल राय यांनी लगावला.

दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. तर ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाले होते. त्यामध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवताना ४८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. तर मागच्या दहा वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला केवळ २२ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.   

टॅग्स :BJPभाजपाdelhiदिल्लीChief Ministerमुख्यमंत्रीAAPआप