शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 17:15 IST

Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला होता. आता ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्यदलांसोबत सर्वसामान्यांनीही केलेल्या प्रेरणादायी कामगिरीच्या कहाण्या समोर येत आहेत.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला होता. आता ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्यदलांसोबत सर्वसामान्यांनीही केलेल्या प्रेरणादायी कामगिरीच्या कहाण्या समोर येत आहेत. गुजरातमधील भारत-पाकिस्तान सीमेपासून २० किमी अंतरावर असलेल्या बनासकांठा जिल्ह्यातील जलोय गाव सध्या असाच चर्चेत आहे. भारताच्या हद्दीतील शेवटचा गाव अशी ओळख असलेल्या या गावचे सरपंच थानाभाई डोडिया यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ला येथे होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कराची मदत केल्याने त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थानाभाई डोडिया यांनी सांगितले की, मला लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आलं आहे. त्यासाठी मी भारत सरकार आणि गुजरात सरकारचे आभार मानतो, असे थानाभाई डोडिया म्हणाले.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूर सुरू असताना जलोया गावातील रहिवाशांनी भारतीय सैन्यदलाला खूप मदत केली होती. जेव्हा लष्कराला मशीनची आवश्यकता होती तेव्हा मशीन पुरवण्यात आल्या. जेव्हा कामगार हवे होते तेव्हा ग्रामस्थ काम करण्यासाठी पुढे सरसारवले. आता या मदतीमुळे आम्हाला हा सन्मान मिळत आहे. मोदींनी आम्हाला ही संधी देऊन आमच्यामध्ये अभिमान निर्माण केला आहे.  आमच्या गावातील ग्रामस्थांचा सुरक्षा दलांसोबत उत्तम ताळमेळ आहे. आम्ही मिळून योजना आखतो आणि एकत्र काम करतो. ग्रामस्थांनी नेहमीच बीएसएफला मदत केली आहे. तसेच त्यांनीही आम्हाला चांगली साथ दिली आहे, असेही सरपंच थानाभाई डोडिया यांनी सांगितले.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरGujaratगुजरातIndependence Dayस्वातंत्र्य दिनsarpanchसरपंच