शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

तीन मुद्द्यांवर ठरणार ईडब्ल्यूएसची वैधता; सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 07:37 IST

केशवानंद भारती खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने १९७३ साली राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेबाबत विवेचन केले होते.

नवी दिल्ली : आर्थिक दुर्बल गटांसाठी  (ईडब्ल्यूएस) शिक्षणसंस्थांतील प्रवेश व नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात केलेल्या याचिकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने तीन महत्त्वाचे मुद्दे निश्चित केले आहेत. त्या मुद्द्यांवर व्यापक विचार करून न्यायालय या प्रकरणी निकाल देईल.केशवानंद भारती खटल्याचा निकाल महत्त्वाचाकेशवानंद भारती खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने १९७३ साली राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेबाबत विवेचन केले होते. राज्यघटनेच्या प्रत्येक भागामध्ये संसदेला सुधारणा करता येणार नाही. कायद्याचे राज्य, अधिकारांचे पृथक्करण, न्यायालयीन स्वातंत्र्य यांसारख्या बाबी राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग बनल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात दुरुस्त्या करता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

व्यापक विचार करून न्यायालय निर्णय देणार -पहिला मुद्दा - आरक्षणासहित काही गोष्टींची विशेष तरतूद करण्याची सरकारला मुभा देऊन राज्यघटना कायद्याने (१०३वी घटनादुरुस्ती) राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का लावला आहे का या पहिल्या मुद्द्याची तपासणी न्यायालय करणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की, आर्थिक दुर्बल गटांसाठीच्या आरक्षणासंदर्भातील याचिकांसंदर्भात तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार व्हावा, असे ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सुचविले होते. त्या मुद्द्यांवर विचार करून या आरक्षणाचा निर्णय घटनाबाह्य आहे किंवा नाही याचा निर्णय न्यायालय करणार आहे. 

दुसरा मुद्दा  -विनाअनुदानित शिक्षणसंस्थांतील प्रवेशांबाबत विशेष तरतूद करण्याची मुभा सरकारला मिळाली आहे. यासंदर्भातील घटनादुरुस्ती ही राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेशी विसंगत आहे का या दुसऱ्या मुद्द्याचीही चिकित्सा सर्वोच्च न्यायालय करणार आहे. 

तिसरा मुद्दा -  आर्थिक दुर्बलांसाठीच्या आरक्षणाच्या कक्षेतून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (एसईबीसी), अन्य मागासवर्गीय (ओबीसी) अनुसूचित जाती-जमाती (एससी-एसटी) यांना वगळण्याचा निर्णय १०३व्या घटनादुरुस्तीच्या आधारे घेतल्याने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भंग होत आहे का हा तिसरा मुद्दाही कोर्ट तपासणार आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयreservationआरक्षण