शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

VIDEO: सणासुदीच्या गर्दीमुळं ट्रेन सुटली, प्रवाशानं तिकिटाचा संपूर्ण परतावा मागीतला! काय सांगतो रेल्वेचा नियम? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 13:42 IST

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी आणि खचाखच भरलेल्या गाड्या दिसत आहेत. या गर्दीमुळे अनेक प्रवासी अडकून पडले असून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचणेही कठीण होत आहे.

सूरत - सणासुदीची गर्दी हाताळण्यात अथवा तिचे व्यवस्थापन करण्यात आलेल्या अपयशामुळे भारतीय रेल्वेला पुन्हा  एकदा टीकांचा सामना करावा लागत आहे. कारण दिवाळीसाठी घरी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी आणि खचाखच भरलेल्या गाड्या दिसत आहेत. या गर्दीमुळे अनेक प्रवासी अडकून पडले असून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचणेही कठीण होत आहे.

एका प्रवाशाने X वर (आधीचे ट्विटर) एक व्हिडिओ शेअर करत, आपण कन्फर्म तिकीट विकत घेतले होते. मात्र सणासुदीच्या गर्दीमुळे आपल्याला ट्रेनमध्ये प्रवेश करता आला नाही, यामुळे आपली ट्रेन सुटली, असा  दावा या प्रवाशाने केला आहे. एवढेच नाही, तर आपल्या सारख्या अनेक लोकांना ट्रेनमध्ये प्रवेशच करता आला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

संबंधित प्रवाशाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (DRM) वडोदरा यांना टॅग करत लहिले आहे, ‘भारतीय रेल्वेचे व्यवस्थापन अत्यंत खराब आहे. माझी दिवाळी बर्बाद केल्याबद्दल धन्यवाद. थर्ड एसीचे कन्फर्म तिकीट असले तरी आपल्याला हेच मिळते. पोलिसांकडूनही सहकार्य मिळाले नाही. माझ्या सारख्या अनेक प्रवाशांना रेल्वेत बसता आले नाही. माला एकूण 1173.95 रुपयांचा परतावा हवा आहे.’

याशिवाय, "कामगार लोकांच्या गर्दीने मला ट्रेनमधून बाहेर ढकलले, दरवाजे बंद केले आणि कुणालाही ट्रेनमध्ये जाऊ दिले नाही. एवढेच नाही, तर पोलिसांनीही मला मदत करण्यास नकार दिला आणि परिस्थितीवर हसू लागले," असेही संबंधित प्रवाशाने म्हटले आहे. याच बरोबर, DRM वडोदराने सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत, रेल्वे पुलिसांकडे घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

काय सांगतो नियम -ट्रेन सुटल्यास आपण आपल्या रिफंडसाठी क्लेम करू शकता. रेल्वेच्या नियमानुसार, जर एखाद्या प्रवाशाची रेल्वे सुटली अथवा 3 तासांहून अधिक लेट झाली, तर आपण तिकट कॅन्सल करून रिफंडसाठी क्लेम करू शकतात. मात्र हा रिफंड मिळविण्यासाठी आपल्याला रेल्वेच्या काही अटी पूर्ण कराव्या लागतील. याशिवाय आपल्याला रिफंड मिळणार नाही. अशा स्थितीत प्रवाशांना टीडीआर फाइल करून रिफंड मिळवता येऊ शकतो. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासीGujaratगुजरातPoliceपोलिस