शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

रेल्वेची पटरी तुटल्यास थेट अधिकाऱ्यांना जाणार मेसेज; CELच्या अभियंत्यांचा अनोखा शोध, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 17:01 IST

Ghaziabad Train New System News: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रेल्वेची पटरी तुटल्यास थेट संबंधित अधिकाऱ्याच्या मोबाईलवर मेसेज जाणार आहे. 

गाझियाबाद : रेल्वे अपघातांची संख्या शून्यावर आणण्यासाठी विविध पातळ्यांवर काम केले जाते. असाच एक प्रयत्न उत्तर प्रदेशातील गाझियाबाद भागात असलेल्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (CEL) या एंटरप्राइझच्या अभियंत्यांनी अशा तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे, ज्याद्वारे रेल्वेची पटरी तुटण्याचा किंवा तडा गेल्याचा मेसेज रेल्वे प्रशासनाला जाईल. अधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर तात्काळ याबाबतची माहिती मिळू शकेल.

दरम्यान, या योजनेमुळे रेल्वे अपघात कमी होण्यास नक्कीच मदत होईल. हे तंत्रज्ञान सध्या दिल्ली मेट्रो ट्रेनच्या ट्रॅकवर वापरले जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्याची यशस्वी चाचणीही झाली आहे. आगामी काळात बॉटनिकल गार्डन ते कालकाजी मंदिर स्थानकादरम्यान मेट्रो ट्रेनच्या रुळांवर ते बसवण्यात येणार आहे. यानंतर भारतीय रेल्वेच्या रुळांवरही ते बसवण्याची योजना आखली जाणार आहे. 

हिवाळ्याच्या दिवसांत रेल्वे रुळांना तडे जाण्याचा किंवा तुटण्याचा धोका असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे रेल्वे अपघाताचा धोका निर्माण होतो. या समस्येचा सामना करण्यासाठी CEL च्या अभियंत्यांनी आता ब्रोकन रेल डिटेक्शन सिस्टम (BRDS) विकसित केली आहे. पटरीवरील 500 मीटर अंतरावर ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्याच्या कक्षेत येणारा ट्रॅक तुटला किंवा त्याला तडा गेला, तर त्याचा मेसेज रेल्वे अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर लगेच जातो. त्यामुळे रुळांची वेळेत दुरुस्ती करता येईल.  

रेल्वेची पटरी तुटल्यास येणार मेसेजया संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना सीईएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक चेतन प्रकाश जैन यांनी म्हटले की, अभियंत्यांनी आत्मनिर्भर भारत अंतर्गत बीआरडीएस ही प्रणाली विकसित केली आहे, ज्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे रुळ तुटण्याची किंवा तडे गेल्याची माहिती लगेच मिळते. दिल्ली मेट्रोच्या ट्रॅकवर त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. दिल्लीतील इतर मेट्रो ट्रॅकवर देखील ते बसवण्यात येणार आहे. या प्रणालीअंतर्गत ट्रॅकला तडा गेल्यास किंवा तुटल्यास अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर तात्काळ मेसेज जाईल. कोणत्याही असामाजिक घटकाने रुळ तोडून रेल्वे अपघात सदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचीही माहिती रेल्वे प्रशासनाला मिळणार आहे. रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची मानली जाते. 

अशा प्रकारे काम करेल यंत्रणा ही यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे स्थानकावर नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार असल्याचे चेतन प्रकाश जैन यांनी सांगितले. सर्व ठिकाणी बसविलेल्या बीआरडीएसची माहिती नियंत्रण कक्षाच्या संगणक स्क्रीनवर उपलब्ध होईल. त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर देखील तयार करण्यात आले असून हे सॉफ्टवेअर रेल्वे अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर अपडेट केले जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही ठिकाणी रेल्वे रुळ तुटल्यास किंवा तडा गेल्यास त्याचा मेसेज रेल्वे अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर जाईल.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशrailwayरेल्वेtechnologyतंत्रज्ञान