शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

राज्यघटनेच्या सरनाम्यातील शब्दांना आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 05:28 IST

१९७६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ४२ व्या घटनादुरुस्तीअंतर्गत संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द समाविष्ट केले होते.

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल देताना १९७६ च्या घटनादुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. या घटनादुरुस्तीत संविधानाच्या सरनाम्यात ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘अखंडता’ असे शब्द समाविष्ट करण्यात आले होते.

४४ वर्षांहून अधिक कालावधीनंतर या घटनादुरुस्तीला आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने म्हटले की, समाजवादी व धर्मनिरपेक्ष यासारखे शब्द सरनाम्याचा अविभाज्य भाग आहेत. सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले की, याला आव्हान देण्याचे कोणतेही कारण किंवा औचित्य आम्हाला सापडत नाही.न्यायमूर्ती संजय कुमार यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सात पानांच्या आदेशात म्हटले आहे की, धर्मनिरपेक्षतेची संकल्पना समानतेच्या अधिकाराच्या पैलूंपैकी एक आहे. १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ४२ व्या घटनादुरुस्तीअंतर्गत संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द समाविष्ट केले होते. राज्यसभेचे माजी सदस्य सुब्रमण्यम स्वामी आणि विधिज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. खंडपीठाने यावरील निकाल २२ नोव्हेंबर रोजी राखून ठेवला होता.

काय म्हटले आदेशात?

या आदेशात खंडपीठाने म्हटले आहे की, संविधान जिवंत दस्तऐवज आहे. संसदेला यात सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. भारताने धर्मनिरपेक्षतेची स्वतःची व्याख्या विकसित केली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय