शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेच्या सरनाम्यातील शब्दांना आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 05:28 IST

१९७६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ४२ व्या घटनादुरुस्तीअंतर्गत संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द समाविष्ट केले होते.

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल देताना १९७६ च्या घटनादुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. या घटनादुरुस्तीत संविधानाच्या सरनाम्यात ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘अखंडता’ असे शब्द समाविष्ट करण्यात आले होते.

४४ वर्षांहून अधिक कालावधीनंतर या घटनादुरुस्तीला आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने म्हटले की, समाजवादी व धर्मनिरपेक्ष यासारखे शब्द सरनाम्याचा अविभाज्य भाग आहेत. सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले की, याला आव्हान देण्याचे कोणतेही कारण किंवा औचित्य आम्हाला सापडत नाही.न्यायमूर्ती संजय कुमार यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सात पानांच्या आदेशात म्हटले आहे की, धर्मनिरपेक्षतेची संकल्पना समानतेच्या अधिकाराच्या पैलूंपैकी एक आहे. १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ४२ व्या घटनादुरुस्तीअंतर्गत संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द समाविष्ट केले होते. राज्यसभेचे माजी सदस्य सुब्रमण्यम स्वामी आणि विधिज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली होती. खंडपीठाने यावरील निकाल २२ नोव्हेंबर रोजी राखून ठेवला होता.

काय म्हटले आदेशात?

या आदेशात खंडपीठाने म्हटले आहे की, संविधान जिवंत दस्तऐवज आहे. संसदेला यात सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. भारताने धर्मनिरपेक्षतेची स्वतःची व्याख्या विकसित केली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय