शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा वेग हाेणार ताशी २२० किमी! वंदे भारतही पडणार मागे, ५९ किलाेमीटरचा टेस्टिंग ट्रॅक हाेताेय तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 07:18 IST

भारतात वंदे भारत एक्स्प्रेस ही सर्वांत वेगवान रेल्वे विविध मार्गांवर सुरू करण्यात आली आहे.

नवी दिल्ली :

भारतात वंदे भारत एक्स्प्रेस ही सर्वांत वेगवान रेल्वे विविध मार्गांवर सुरू करण्यात आली आहे. आता वंदे भारतपेक्षा जास्त वेगाने रेल्वे चालविण्याची तयारी भारतीय रेल्वेने सुरू केली आहे. या गाड्या ताशी २२० किमी एवढ्या वेगाने चालविण्याचा प्रयत्न असून त्यासाठी राजस्थानमध्ये टेस्टिंग ट्रॅक विकसित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यावर सध्याच्या राेलिंग स्टाॅकचीही चाचणी शक्य हाेणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अशी सुविधा असलेला भारत पहिलाच देश ठरणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस ताशी १८० किलाेमीटर एवढ्या वेगाने चाचणीदरम्यान धावली हाेती. ही गाडी सेमी हायस्पीड या श्रेणीमध्ये येते. भविष्यात ताशी २२० किमी वेगाने रेल्वे चालविण्याची याेजना आहे. 

असा असेल ट्रॅक२३ किमीचा हाय स्पीड मेन ट्रॅक राहणार आहे.१३ किमी हायस्पीड लूप ट्रॅक गुढा येथे असेल.३ किमीचा जलद टेस्टिंग लूप नवा येथे राहणार आहे.२० किमीचा कर्व्ह टेस्टिंग लूप उभारण्यात येईल.

या गाड्यांच्या चाचणीसाठी जाेधपूर विभागात गुढा-थथना मीठडी या दरम्यान ५९ किलाेमीटरचा टेस्टिंग ट्रॅक तयार करण्यात येत आहे. त्याचा पहिला टप्पा यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण हाेणार असून, २०२४ च्या अखेरपर्यंत दुसरा टप्पादेखील पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

अशी हाेईल चाचणी- या टेस्ट ट्रॅकवर रेल्वे धावताना सर्व सुरक्षेचे मापदंड तपासण्यात येतील. त्यात स्टॅबिलिटी, व्हील ऑफलाेडिंग, ट्रॅक ओव्हरहेड इक्विपमेंट तसेच सिग्नलिंग यंत्रणांचा समावेश राहील. 

राेलिंग स्टाॅक म्हणजे काय?रेल्वेमध्ये नियमितपणे वापरण्यात येत असलेले काेच तसेच डब्यांना राेलिंग स्टाॅक म्हटले जाते. प्रवासी आणि माल गाडीचे डबे याचाच भाग आहेत. हाय स्पीड ट्रॅकवर यांचीही चाचणी रेल्वे करणार आहे.

भारतीय रेल्वेकडून येणाऱ्या काळात ॲल्युमिनियमचा वापर करून १०० ‘वंदे भारत’ची निर्मिती केली जाणार आहे. सध्या स्टेनलेस स्टीलपासून रेल्वे बनविण्यात येतात. ॲल्युमिनियमच्या गाड्या वजनाने हलक्या राहतात. त्या सहज ताशी २०० किमी वेगाने धावू शकतात.

ताशी २२० किमी वेगाने चाचणी पुरेसी नाही. सर्वप्रथम मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-हावडा यासारख्या प्रमुख मार्गांवर ट्रॅक अपग्रेड करण्याची गरज आहे.    - सुधांशू मणि, रचनाकार, वंदे भारत एक्स्प्रेस