शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

जम्मू-काश्मीरची परिस्थिती बदलतेय; सैनिकांवरील दगडफेकीच्या घटनांमध्ये 99% घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 17:30 IST

सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण 60 टक्क्यांनी कमी झाले.

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर राज्यातील परिस्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये यापूर्वी जवानांवर होणारे हल्ले, दगडफेक आणि घुसखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, दगडफेकीच्या घटना जवळजवळ पूर्णपणे संपल्या आहेत. यावरुन जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट होते. 

सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण 60 टक्के कमी मीडिया रिपोर्टनुसार, सुरक्षा दलांमधील घातपात, म्हणजेच सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण 60 टक्क्यांनी कमी झाले आहे. या वर्षी जी-20 बैठकही श्रीनगरमध्ये झाली. केंद्रीय गृह मंत्रालय जम्मू आणि काश्मीरवर लक्ष ठेवून आहे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नियमित अंतराने बैठका सुरू असतात. 

दगडफेकीच्या घटनांमध्ये मोठी घटआकडेवारीनुसार, 2020 च्या पहिल्या सहा महिन्यांत, स्थानिक अधिकाऱ्यांनी दगडफेकीच्या एकूण 324 घटनांची नोंद केली. पुढच्या वर्षी अशा घटना 179 पर्यंत खाली आल्या. 2022 आणि 2023 मध्ये याच कालावधीत एकूण 50 आणि 3 घटनांची नोंद झाली आहे. 2020 पासून जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या सुरक्षा जवानांच्या संख्येत मोठी घट दिसून आली आहे, हा आकडा 32 वरून 11 वर आला आहे.

स्फोटकांच्या जप्तीमध्ये मोठी घटजम्मू-काश्मीरमधून स्फोटके आणि ग्रेनेड्सच्या जप्तीतही घट झाली आहे. 2021 मध्ये सुरक्षा दलांनी सुमारे 68 किलो स्फोटके जप्त केली. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ही संख्या शून्य आहे. 2020 मधील 266 वरून 2023 मध्ये ग्रेनेड जप्तीचे प्रमाण 83 पर्यंत कमी झाले आहे. शस्त्रास्त्रांचा साठाही 246 वरून 73 वर आला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद