शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'सावरकर प्रकरण आता बंद झाले, पण...', काँग्रेसने भाजपसमोर ठेवली एक मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 17:43 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप-काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन देशातील राजकारण पुन्हा तापले आहे. एकीकडे भाजपवाले सावरकरांना महान क्रांतिकारक म्हणून पाहतात, तर दुसरीकडे सावरकरांनी इंग्रजांसमोर पराभव स्वीकारला आणि माफी मागितली असा काँग्रेसचा दावा आहे. आता या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपसमोर एक अट ठेवली आहे. भाजपच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांवर भाष्य करू नये, आम्हीही त्यांच्या नेत्यांचे सत्य जगासमोर आणणार नाहीत, अशी अट काँग्रेसने ठेवली आहे.

काँग्रेसने काय अट घातली?काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सावरकर प्रकरण आता बंद झाल्याचे म्हटले आहे. भाजप आणि संघाच्या लोकांनी आमच्या नेत्यांबद्दल खोटे पसरवणे थांबवावे. त्यांच्या नेत्यांची सत्यताही आम्ही सर्वांसमोर मांडणार नाही. आता इथे जयराम रमेश यांनी ते कोणत्या नेत्यांबद्दल बोलत आहेत, हे स्पष्ट केले नाही. पण भाजपचे जुने हल्ले लक्षात घेता, इथे ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी अशा नेत्यांबद्दल बोलत आहेत, असे जाणून येते.

काय म्हणाले राहुल गांधी?काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका विधानाने सावरकर वादाला सुरुवात झाली. भारत जोडो यात्रेदरम्यान एका सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी वीर सावरकरांबद्दल अनेक दावे केले होते. सावरकरांनी इंग्रजांना मदत केल्याचे ते म्हणाले होते. देशात एका बाजूला सावरकर आणि दुसरीकडे गांधी यांच्या विचारांची लढाई सुरू आहे. माझे मत आहे की सावरकरांनी भीतीपोटी पत्रावर सही केली, तर नेहरू, पटेल, गांधी वर्षानुवर्षे तुरुंगात राहिले. सावरकरांनी पत्रावर स्वाक्षरी करणे, हा भारतातील सर्व नेत्यांचा विश्वासघात होता, अशी टीका राहुल यांनी केली होती.

उद्धव यांनी निशाणा साधला होताराहुल यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि भाजप लगेच आक्रमक झाला. भाजपसोबतच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही राहुल गांधींच्या या वक्तव्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले होते. वीर सावरकरांबाबत राहुल गांधींच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही, असे उद्धव म्हणाले होते. वीर सावरकरांबद्दल आमच्या मनात आदर आहे, त्यांचे योगदान कोणीही पुसून टाकू शकत नाही, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा