शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

'सावरकर प्रकरण आता बंद झाले, पण...', काँग्रेसने भाजपसमोर ठेवली एक मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 17:43 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप-काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुन देशातील राजकारण पुन्हा तापले आहे. एकीकडे भाजपवाले सावरकरांना महान क्रांतिकारक म्हणून पाहतात, तर दुसरीकडे सावरकरांनी इंग्रजांसमोर पराभव स्वीकारला आणि माफी मागितली असा काँग्रेसचा दावा आहे. आता या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपसमोर एक अट ठेवली आहे. भाजपच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांवर भाष्य करू नये, आम्हीही त्यांच्या नेत्यांचे सत्य जगासमोर आणणार नाहीत, अशी अट काँग्रेसने ठेवली आहे.

काँग्रेसने काय अट घातली?काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सावरकर प्रकरण आता बंद झाल्याचे म्हटले आहे. भाजप आणि संघाच्या लोकांनी आमच्या नेत्यांबद्दल खोटे पसरवणे थांबवावे. त्यांच्या नेत्यांची सत्यताही आम्ही सर्वांसमोर मांडणार नाही. आता इथे जयराम रमेश यांनी ते कोणत्या नेत्यांबद्दल बोलत आहेत, हे स्पष्ट केले नाही. पण भाजपचे जुने हल्ले लक्षात घेता, इथे ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी अशा नेत्यांबद्दल बोलत आहेत, असे जाणून येते.

काय म्हणाले राहुल गांधी?काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका विधानाने सावरकर वादाला सुरुवात झाली. भारत जोडो यात्रेदरम्यान एका सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी वीर सावरकरांबद्दल अनेक दावे केले होते. सावरकरांनी इंग्रजांना मदत केल्याचे ते म्हणाले होते. देशात एका बाजूला सावरकर आणि दुसरीकडे गांधी यांच्या विचारांची लढाई सुरू आहे. माझे मत आहे की सावरकरांनी भीतीपोटी पत्रावर सही केली, तर नेहरू, पटेल, गांधी वर्षानुवर्षे तुरुंगात राहिले. सावरकरांनी पत्रावर स्वाक्षरी करणे, हा भारतातील सर्व नेत्यांचा विश्वासघात होता, अशी टीका राहुल यांनी केली होती.

उद्धव यांनी निशाणा साधला होताराहुल यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि भाजप लगेच आक्रमक झाला. भाजपसोबतच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीही राहुल गांधींच्या या वक्तव्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले होते. वीर सावरकरांबाबत राहुल गांधींच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाही, असे उद्धव म्हणाले होते. वीर सावरकरांबद्दल आमच्या मनात आदर आहे, त्यांचे योगदान कोणीही पुसून टाकू शकत नाही, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा