शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याच्या चौकटीत सरकारवर टीकेचा अधिकार; प्राध्यापकावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलिस यंत्रणेची SC कडून कानउघडणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 07:24 IST

प्राध्यापक जावेद अहमद हजाम यांनी १३ आणि १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान आपल्या व्हॉट्सॲप समूहावर मेसेज टाकले होते.

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निषेधार्थ व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणाऱ्या कोल्हापूरच्या एका प्राध्यापकाविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्दबातल करताना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांची कानउघाडणी केली आहे. 

प्रत्येक टीका किंवा निषेधाविरुद्ध भादंवि कलम १५३ अ खाली गुन्हा नोंदविला जाणार असेल तर देशात लोकशाही शाबूतच राहणार नाही, असे भाष्य सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना केले. कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीवर टीका करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे, असे नमूद करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या पीठाने मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवला. 

प्राध्यापक जावेद अहमद हजाम यांनी १३ आणि १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान आपल्या व्हॉट्सॲप समूहावर मेसेज टाकले होते.

पोलीस यंत्रणेला राज्य घटनेतील अनुच्छेद १९ (१) (अ) अन्वये लाभलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या संकल्पनेची जाणीव करुन शिक्षित करण्याची वेळ आली आहे, असे निरिक्षण सर्वाेच्च न्यायालयाने नाेंदविले.

काय आहे नागरिकांचा अधिकार?- संविधानाच्या अनुच्छेद १९ (१) (अ) अन्वये असहमती व्यक्त करण्याचा नागरिकांना विधिसंमत आणि कायदेशीर अधिकार लाभला आहे. - सरकारच्या निर्णयांचा शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदविणे हा लोकशाहीचा अनिवार्य भाग आहे. - कायदेशीर मार्गाने मतभिन्नता व्यक्त करणे हे अनुच्छेद २१ ने दिलेल्या अधिकारात मोडते. मात्र, असहमती किंवा निषेध लोकशाहीच्या चौकटीतच असायला हवी. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकारPoliceपोलिसCourtन्यायालय