शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 06:13 IST

दोन्ही देशांचे सैनिक आज परस्परांना देणार मिठाई

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (एलएसी) डेमचोक व डेपसांग या दोन ठिकाणांवरील सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे व तिथे लवकरच गस्त सुरू होणार असल्याचे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले. दिवाळीनिमित्त दोन्ही देशांचे सैनिक उद्या, गुरुवारी परस्परांना मिठाई देणार आहेत. पण हा समारंभ नेमका कोणत्या ठिकाणी होणार याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.सैन्य मागे घेण्याची पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांनी काही बाबींची पडताळणी सुरू केली आहे. 

गलवानमध्ये झाला होता मोठा संघर्षभारत, चीनच्या लष्करांमध्ये गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये संघर्ष झाला होता. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी २१ ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, भारत व चीनमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरील सैन्य मागे घेण्याबाबत करार करण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून बोलणी सुरू होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तसा करार झाला. आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे. 

यात आमची काहीही भूमिका नाही : अमेरिकाभारत-चीनच्या सीमेवरील तणाव कमी करण्यात आम्ही कोणतीही भूमिका बजावत नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी झाल्यास त्याचे आम्ही स्वागतच करू, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले. ‘संबंध सुरळीत होणार’ भारतातील चीनचे राजदूत क्सू फेईहाँग यांनी कोलकाता येथे सांगितले की, या करारानंतर आता दोन्ही देशांतील संबंध भविष्यात सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन