शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

'राज्यपाल'पद हे लोकशाहीवरचं ओझं, ते रद्द व्हावं; मनिष सिसोदिया यांची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 21:05 IST

राज्यपाल आणि सरकारमधील संघर्षाचा फटका प्रशासकीय नोकरदार वर्गाला, राज्यपालपद रद्द करण्याची मनिष सिसोदियांची मागणी

नवी दिल्ली - राज्यपालपद हे लोकशाहीवरचं ओझं बनलंय, ते पद संपुष्टात आणायला हवं तरच निवडून आलेली सरकारे सुरळीतपणे चालू शकतात. राज्यपालांचे काम एनडीए नसलेल्या सरकारांना पाडणे आणि त्यांचे काम थांबवणे एवढेच असते असं मोठं विधान दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनिष सिसोदिया यांनी केले आहे. पीटीआयशी बोलताना सिसोदियांनी हे भाष्य केले. 

दिल्लीत उपराज्यपाल आणि आम आदमी पार्टीच्या सरकारमधील संघर्ष वारंवार समोर येतात. त्यात निवडून आलेल्या सरकारचा निर्णय घेण्याचा अधिकार हिरावून घेणे हे संघर्षाचे प्रमुख कारण आहे. ही लोकशाहीची हत्या असून उपराज्यपाल आणि निवडून आलेले सरकार यांच्यातील संघर्षाचा फटका दिल्लीतील प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना बसतोय असंही मनिष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

तसेच दिल्लीतील प्रशासकीय नोकरदार वर्गाला उपराज्यपाल आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्षाचा परिणाम भोगावा लागत आहे. सरकारला त्याबद्दल खंत वाटतेय. दिल्लीतील उपराज्यपाल कार्यालय आणि आप सरकारमध्ये प्रशासनाच्या अनेक मुद्द्यांवरून संघर्ष सुरू आहे.जेव्हा लोकशाहीची हत्या होते तेव्हा सर्व संबंधितांना याचा फटका बसतो. सरकारी अधिकारीही त्रस्त आहेत आणि मला त्यांचे वाईट वाटते. राज्यपाल पद रद्द करावे अशी मागणी मनिष सिसोदिया यांनी केली आहे.

दरम्यान, हा मुद्दा केवळ दिल्लीचा नाही तर पश्चिम बंगाल, केरळसह अन्य राज्यांमध्येही असा समस्या निर्माण होत आहेत. ही प्रवृत्ती पूर्ण देशात हुकुमशाहीला चालना देत आहे. हुकुमशाहीमुळेच दिल्ली आणि अन्य राज्यांचे नुकसान होत आहे. राज्यपालांची नियुक्ती केवळ निवडून आलेल्या सरकारच्या कामकाजात अडथळे आणणे हा असल्याचा आरोप मनिष सिसोदिया यांनी केला.

महाराष्ट्रातही झाला होता राज्यपालांवरून संघर्ष

राज्यात २०१९ च्या निकालानंतर अनेक राजकीय समीकरणे बदलली. त्यात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात महाविकास आघाडी सरकारचा संघर्ष समोर येत होता. देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीसाठी राज्यपालांवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले होते. त्याचसोबत राज्यपाल नियुक्त १२ विधान परिषदेच्या जागांची यादी देऊनही त्यावर राज्यपालांकडून शिक्कामोर्तब करण्यास विलंब लावला जात असल्याचा आरोप मविआने केला होता. अनेकदा मविआ नेते यांनी भाजपाच्या मनमानी कारभारावर बोट ठेवत राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाAAPआपMahavikas Aghadiमहाविकास आघाडी