शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
4
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
5
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
6
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
7
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
8
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
9
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
10
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
11
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
13
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
14
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
15
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
16
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
17
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
18
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
19
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
20
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत

'राज्यपाल'पद हे लोकशाहीवरचं ओझं, ते रद्द व्हावं; मनिष सिसोदिया यांची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 21:05 IST

राज्यपाल आणि सरकारमधील संघर्षाचा फटका प्रशासकीय नोकरदार वर्गाला, राज्यपालपद रद्द करण्याची मनिष सिसोदियांची मागणी

नवी दिल्ली - राज्यपालपद हे लोकशाहीवरचं ओझं बनलंय, ते पद संपुष्टात आणायला हवं तरच निवडून आलेली सरकारे सुरळीतपणे चालू शकतात. राज्यपालांचे काम एनडीए नसलेल्या सरकारांना पाडणे आणि त्यांचे काम थांबवणे एवढेच असते असं मोठं विधान दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनिष सिसोदिया यांनी केले आहे. पीटीआयशी बोलताना सिसोदियांनी हे भाष्य केले. 

दिल्लीत उपराज्यपाल आणि आम आदमी पार्टीच्या सरकारमधील संघर्ष वारंवार समोर येतात. त्यात निवडून आलेल्या सरकारचा निर्णय घेण्याचा अधिकार हिरावून घेणे हे संघर्षाचे प्रमुख कारण आहे. ही लोकशाहीची हत्या असून उपराज्यपाल आणि निवडून आलेले सरकार यांच्यातील संघर्षाचा फटका दिल्लीतील प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना बसतोय असंही मनिष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

तसेच दिल्लीतील प्रशासकीय नोकरदार वर्गाला उपराज्यपाल आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्षाचा परिणाम भोगावा लागत आहे. सरकारला त्याबद्दल खंत वाटतेय. दिल्लीतील उपराज्यपाल कार्यालय आणि आप सरकारमध्ये प्रशासनाच्या अनेक मुद्द्यांवरून संघर्ष सुरू आहे.जेव्हा लोकशाहीची हत्या होते तेव्हा सर्व संबंधितांना याचा फटका बसतो. सरकारी अधिकारीही त्रस्त आहेत आणि मला त्यांचे वाईट वाटते. राज्यपाल पद रद्द करावे अशी मागणी मनिष सिसोदिया यांनी केली आहे.

दरम्यान, हा मुद्दा केवळ दिल्लीचा नाही तर पश्चिम बंगाल, केरळसह अन्य राज्यांमध्येही असा समस्या निर्माण होत आहेत. ही प्रवृत्ती पूर्ण देशात हुकुमशाहीला चालना देत आहे. हुकुमशाहीमुळेच दिल्ली आणि अन्य राज्यांचे नुकसान होत आहे. राज्यपालांची नियुक्ती केवळ निवडून आलेल्या सरकारच्या कामकाजात अडथळे आणणे हा असल्याचा आरोप मनिष सिसोदिया यांनी केला.

महाराष्ट्रातही झाला होता राज्यपालांवरून संघर्ष

राज्यात २०१९ च्या निकालानंतर अनेक राजकीय समीकरणे बदलली. त्यात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात महाविकास आघाडी सरकारचा संघर्ष समोर येत होता. देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीसाठी राज्यपालांवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले होते. त्याचसोबत राज्यपाल नियुक्त १२ विधान परिषदेच्या जागांची यादी देऊनही त्यावर राज्यपालांकडून शिक्कामोर्तब करण्यास विलंब लावला जात असल्याचा आरोप मविआने केला होता. अनेकदा मविआ नेते यांनी भाजपाच्या मनमानी कारभारावर बोट ठेवत राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाAAPआपMahavikas Aghadiमहाविकास आघाडी