शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

...तर भोलेबाबांचीही चौकशी,  २ महिलांसह ६ सेवेकरी अटकेत; 'त्या'साठी १ लाखाचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 06:51 IST

फरार आरोपी देवप्रकाश मधुकर याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

मैनपुरी : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगाच्या कार्यक्रमस्थळी सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या दोन महिलांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक व सध्या फरार असलेला मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्याला पकडून देणाऱ्यास पोलिसांनी १ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. आवश्यकता वाटल्यास भोलेबाबाचीही पोलिस चौकशी करणार आहेत.

राम लडाईत (वय ५० वर्षे), उपेंद्र यादव (६२), मेघ सिंग (६१), मुकेश कुमार (३८) तसेच महिलांपैकी मंजू यादव (३०) आणि मंजू देवी (४०) अशी अटक केलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. हाथरस येथे २ जुलै रोजी सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता. सत्संगाला ८० हजार लोकांनी उपस्थित राहण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती; पण प्रत्यक्षात अडीच लाख लोक हजर राहिले, असे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. 

भोलेबाबाचा मुख्य सेवेकरी झाला फरारमुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर हाथरसच्या सिकंदराराऊ येथील रहिवासी असून तो भोलेबाबा यांचा निकटवर्तीय आहे. त्याचे घर सध्या बंद असून तो परिवारासहित फरार झाला असल्याचे सांगण्यात आले. मैनपुरी येथील भोलेबाबांच्या आश्रमामध्ये पोलिसांनी बुधवारी रात्री प्रवेश केला होता. 

दुर्घटनेमागे मोठा कट असण्याची शक्यताउत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  या दुर्घटनेमागे मोठा कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले होते. चौकशी समिती आपला अहवाल दोन महिन्यांत सरकारला सादर करणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

सर्व मृतदेहांची ओळख पटलीहाथरस येथील चेंगराचेंगरीमध्ये जीव गमावलेल्या सर्व १२१ लोकांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे, असे तेथील जिल्हाधिकारी आशिषकुमार यांनी गुरुवारी सांगितले. हे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

राहुल गांधी आज हाथरसला भेट देणारलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील हाथरस येथे शुक्रवारी दौरा करणार आहेत. ही माहिती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी तिरुवअनंतपुरम येथे गुरुवारी दिली. हाथरस येथील सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन १२१ जणांचा बळी गेला होता. ही अतिशय दुर्दैवी घटना होती, असेही ते म्हणाले. हाथरसमधील दुर्घटनेत जखमी झालेले लोक, मृतांचे नातेवाईक यांच्याशी राहुल गांधी संवाद साधतील. 

टॅग्स :Policeपोलिस