शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

बृजभूषण सिंह लढवय्या माणूस, मागे हटणार नाही; शिवसेनेनं केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 12:51 IST

त्यांचे महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना नेताजी म्हणतो असं संजय राऊतांनी बृजभूषण सिंह यांच्याबाबत म्हटलं.

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील जनतेच्या भावनांचा उद्रेक एखादा नेता करत असेल तर त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. राज ठाकरेंनी पूर्वीची भूमिका होती ती का सोडली माहिती नाही. हिंदी भाषिकांविरोधात भूमिका घेतली होती. मराठी अस्मितेबद्दल बोलत होते, मग अचानक एका रात्रीत हिंदुत्व आठवले आणि अयोध्येला निघाले अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, बृजभूषण शरण सिंह हे त्यांची भूमिका मांडत आहेत. बृजभूषण सिंह यांना मी अनेक वर्ष ओळखतो. तो माणूस लढवय्या आहे. त्यांचे महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना नेताजी म्हणतो. ते स्वत: पैलवान आहेत. अनेक कुस्तीगीर त्यांनी निर्माण केले. आम्ही एकत्र काम केले आहे तो माणूस मागे हटणार नाही असं वाटतं अशा शब्दात शिवसेनेने त्यांचे कौतुक केले आहे.

त्याचसोबत साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना राऊतांनी म्हटलं की, या देशात साधू कोण आहे? कोणीही उठतो साधू बनतो असं नाही. साधू ही वृत्ती अंगात असावी लागते. जटा वाढवल्याने कुणी साधू बनत नाही. आमचा अयोध्येतील दौरा राजकीय नाही. अयोध्येशी शिवसेनेचं नातं घट्ट आहे. राज ठाकरेंनी अयोध्येत घर घेतले, आश्रम बांधले तरी शिवसेनेला काही फरक पडणार नाही अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे.

२०२४ ची तयारी सुरू

प्रत्येक धार्मिक आणि ऐतिहासिक जागांचं उत्खनन करून धार्मिक तेढ निर्माण करायचे. दंगली पेटवायच्या हे दोन्ही बाजूने टाळायला हवे. अनेक हिंदुत्ववादी संघटना आहे. प्रत्येक पाऊल संयमाने काळजीपूर्वक घ्यावं. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढायला हवी परंतु भाजपाकडून २०२४ ची तयारी सुरू आहे. महागाईवर कोणी बोलत नाही. बेरोजगारीवर कोणी बोलत नाही. फक्त मशीद, मंदिर यावर निवडणुका लढवल्या जात आहेत. कैलास मानसरोवर चीनच्या ताब्यात आहे ते भारताने मिळवावं असं आव्हान संजय राऊतांनी केलं आहे.

कांचनगिरींनी पत्रात काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या(MNS Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना रोखावं अन्यथा संत, नागासाधू यांचा सामना करावा लागेल असं थेट पत्र कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे. राजकीय लढाई करायची असेल तर जरूर करा, पण देवदर्शनासाठी जर कुणाला अडवत असाल तर याद राखा. सर्व साधू संतांचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा आहे असं गुरु माँ कांचनगिरी यांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेAyodhyaअयोध्या