शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

रात्रीचा लख्ख प्रकाश करतो झोपेचं खोबरं, जीवजंतूंवरही झाले परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 10:01 IST

निद्राचक्र बदलले; जीवजंतूंवरही झाले परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील मुंबईसह इतर महानगरे  २४ तास जागी असतात, असे म्हटले जाते. ती शहरे रात्री खूप प्रकाशमान असतात. त्यामुळे फार सुंदरही दिसतात. मात्र तिथे रात्री असलेल्या दिव्यांच्या झगमगाटामुळे पर्यावरण तसेच जीवजंतूंचे नुकसान होत आहे. शिवाय माणसाच्या निद्रेचे चक्रही या दिव्यांच्या प्रकाशामुळे बदलले आहे.

‘आर्टिफिशियल लाइट ॲट नाईट : स्टेट ऑफ दी सायन्स २०२२’ असे शीर्षक असलेल्या अहवालात म्हटले आहे की, प्रकाशामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रमाणात सतत वाढ होत आहे. जगातील ८० टक्के लोकसंख्या प्रकाशामुळे प्रदूषित झालेल्या वातावरणात राहते.

एलईडी दिव्याचे तोेटे अधिकअमेरिका-युरोपमध्ये प्रकाशामुळे होणारे प्रदूषण ९९ टक्के आहे. ब्रिटन, इटली, आयर्लंडमध्ये प्रकाशामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. सायन्स ॲडव्हान्सेज जर्नलच्या सप्टेंबरमधील अंकात एका लेखात म्हटले आहे की, एलईडी दिवा ऊर्जा वाचवितो हे खरे असले तरी सोडिअम लाईटच्या तुलनेत त्याचा प्रकाश प्रखर असतो. त्याचेही अनेक तोटे आहेत.

प्रखर प्रकाशामुळे दृष्टीवर होतो परिणामn मुंबई, पुुणे, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आदी मोठ्या शहरांतील उड्डाणपुलांवर, रस्त्यांवर रात्रभर एलईडी लाईट लावण्यात येतात. n या एलईडीच्या प्रकाशामुळे माणूस व अन्य प्राण्यांचे निद्राचक्र भंग पावले आहे. त्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो. n तसेच हृदरोग, मधुमेह, स्थुलत्व आदी विकार होण्याची शक्यता असते. प्रकाशाचे प्रदूषण शरीरातील प्रथिने व अन्य उपकारक गोष्टींचे प्रमाण कमी करते. 

४०% कमी झाला फुलांचा सुगंध

नैसर्गिक प्रकाशामुळे झाडे उत्तम प्रकारे वाढतात. पण, कृत्रिम प्रकाशात झाडांची नीट वाढ होत नाही. काही देशांत रातराणीच्या झाडाला फुले येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. काही फळांच्या चवीत फरक पडला आहे. गुलाब, रातराणी आदी फुलांचा सुगंध कृत्रिम प्रकाशामुळे ४० टक्के कमी झाला आहे. सोडियम व एलईडी लाईटमुळे पाळीव जनावरेही आक्रमक बनली आहेत, असे काही पाहण्यात आढळून आले. 

टॅग्स :NightlifeनाईटलाईफHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य