शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रात्रीचा लख्ख प्रकाश करतो झोपेचं खोबरं, जीवजंतूंवरही झाले परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 10:01 IST

निद्राचक्र बदलले; जीवजंतूंवरही झाले परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील मुंबईसह इतर महानगरे  २४ तास जागी असतात, असे म्हटले जाते. ती शहरे रात्री खूप प्रकाशमान असतात. त्यामुळे फार सुंदरही दिसतात. मात्र तिथे रात्री असलेल्या दिव्यांच्या झगमगाटामुळे पर्यावरण तसेच जीवजंतूंचे नुकसान होत आहे. शिवाय माणसाच्या निद्रेचे चक्रही या दिव्यांच्या प्रकाशामुळे बदलले आहे.

‘आर्टिफिशियल लाइट ॲट नाईट : स्टेट ऑफ दी सायन्स २०२२’ असे शीर्षक असलेल्या अहवालात म्हटले आहे की, प्रकाशामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रमाणात सतत वाढ होत आहे. जगातील ८० टक्के लोकसंख्या प्रकाशामुळे प्रदूषित झालेल्या वातावरणात राहते.

एलईडी दिव्याचे तोेटे अधिकअमेरिका-युरोपमध्ये प्रकाशामुळे होणारे प्रदूषण ९९ टक्के आहे. ब्रिटन, इटली, आयर्लंडमध्ये प्रकाशामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. सायन्स ॲडव्हान्सेज जर्नलच्या सप्टेंबरमधील अंकात एका लेखात म्हटले आहे की, एलईडी दिवा ऊर्जा वाचवितो हे खरे असले तरी सोडिअम लाईटच्या तुलनेत त्याचा प्रकाश प्रखर असतो. त्याचेही अनेक तोटे आहेत.

प्रखर प्रकाशामुळे दृष्टीवर होतो परिणामn मुंबई, पुुणे, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आदी मोठ्या शहरांतील उड्डाणपुलांवर, रस्त्यांवर रात्रभर एलईडी लाईट लावण्यात येतात. n या एलईडीच्या प्रकाशामुळे माणूस व अन्य प्राण्यांचे निद्राचक्र भंग पावले आहे. त्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो. n तसेच हृदरोग, मधुमेह, स्थुलत्व आदी विकार होण्याची शक्यता असते. प्रकाशाचे प्रदूषण शरीरातील प्रथिने व अन्य उपकारक गोष्टींचे प्रमाण कमी करते. 

४०% कमी झाला फुलांचा सुगंध

नैसर्गिक प्रकाशामुळे झाडे उत्तम प्रकारे वाढतात. पण, कृत्रिम प्रकाशात झाडांची नीट वाढ होत नाही. काही देशांत रातराणीच्या झाडाला फुले येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले आहे. काही फळांच्या चवीत फरक पडला आहे. गुलाब, रातराणी आदी फुलांचा सुगंध कृत्रिम प्रकाशामुळे ४० टक्के कमी झाला आहे. सोडियम व एलईडी लाईटमुळे पाळीव जनावरेही आक्रमक बनली आहेत, असे काही पाहण्यात आढळून आले. 

टॅग्स :NightlifeनाईटलाईफHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य