शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मान्सून परतीच्या प्रवासाकडे, जातानाही बरसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 06:37 IST

मान्सूनच्या पुनरागमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 

नवी दिल्ली : देशभरात सरासरी सहा टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर तो आज, सोमवारपासून परतीच्या मार्गावर निघणार आहे. याची सुरुवात पश्चिम राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातून होणार आहे. परतीच्या मान्सूनमुळे दक्षिण आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या पुनरागमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 

महाराष्ट्रात काय?

दुष्काळाचा कायमचा पाहुणा असलेल्या राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा ५८ टक्के जास्त पाऊस झाला. देशात सरासरी ८२.७२ सेंटीमीटर पावसाच्या तुलनेत यंदा ८८.२० सेंटीमीटर पाऊस झाला आहे. मध्य प्रदेशात सामान्यपेक्षा १५% जास्त आणि छत्तीसगडमध्ये ६% जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात २२ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये आनंदी आनंद

यंदा खरिपाच्या पेरणी क्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. गतवर्षी खरीप हंगामात १०७२.९४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, तर यंदा १०९६.६५ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. कापूस आणि ताग वगळता तांदूळ, कडधान्ये, तेलबिया आणि भरड धान्य यांसारख्या इतर सर्व पिकांचे क्षेत्र वाढले आहे.

लवकर आला, सहा दिवस उशिराने जाणार 

यावेळी केरळ आणि ईशान्य भारतात ३० मे रोजी मान्सूनचे एकाच वेळी आगमन झाले, जे आगमनाच्या सामान्य तारखेच्या दोन दिवस आधी होते. मान्सून माघारीची सामान्य तारीख १७ सप्टेंबर असली, तरी तो सहा दिवस उशिरा परतीकडे निघणार आहे. २ जुलै रोजी मान्सूनने संपूर्ण देश व्यापला.

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र