शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मान्सून परतीच्या प्रवासाकडे, जातानाही बरसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 06:37 IST

मान्सूनच्या पुनरागमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 

नवी दिल्ली : देशभरात सरासरी सहा टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर तो आज, सोमवारपासून परतीच्या मार्गावर निघणार आहे. याची सुरुवात पश्चिम राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातून होणार आहे. परतीच्या मान्सूनमुळे दक्षिण आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या पुनरागमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 

महाराष्ट्रात काय?

दुष्काळाचा कायमचा पाहुणा असलेल्या राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा ५८ टक्के जास्त पाऊस झाला. देशात सरासरी ८२.७२ सेंटीमीटर पावसाच्या तुलनेत यंदा ८८.२० सेंटीमीटर पाऊस झाला आहे. मध्य प्रदेशात सामान्यपेक्षा १५% जास्त आणि छत्तीसगडमध्ये ६% जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात २२ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये आनंदी आनंद

यंदा खरिपाच्या पेरणी क्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. गतवर्षी खरीप हंगामात १०७२.९४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, तर यंदा १०९६.६५ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. कापूस आणि ताग वगळता तांदूळ, कडधान्ये, तेलबिया आणि भरड धान्य यांसारख्या इतर सर्व पिकांचे क्षेत्र वाढले आहे.

लवकर आला, सहा दिवस उशिराने जाणार 

यावेळी केरळ आणि ईशान्य भारतात ३० मे रोजी मान्सूनचे एकाच वेळी आगमन झाले, जे आगमनाच्या सामान्य तारखेच्या दोन दिवस आधी होते. मान्सून माघारीची सामान्य तारीख १७ सप्टेंबर असली, तरी तो सहा दिवस उशिरा परतीकडे निघणार आहे. २ जुलै रोजी मान्सूनने संपूर्ण देश व्यापला.

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र