शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

'आदिपुरुष'च्या निर्मात्यांना हायकोर्टाने कडक शब्दात झापलं; नोटीसही जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 20:47 IST

रिलीज झाल्यापासून 'आदिपुरुष' वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाच्या निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला.

साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि क्रिती सनॉन(Kriti Sanon) यांची मुख्य भूमिका असलेला 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट २०२३ चा बहुप्रतीक्षित चित्रपट होता. रामायणावर आधारित हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अखेर 'आदिपुरुष' १६ जूनला थिएटरमध्ये दाखल झाला आणि पहिल्याच दिवशी त्याने रेकॉर्डही तोडले. एका दमदार सुरुवातीच्या वीकेंडनंतर, चित्रपट त्याच्या खराब संवाद, व्हीएफएक्स आणि पात्रांमुळे वादात सापडला. संतप्त लोकांनी हा चित्रपट पूर्णपणे नाकारला असून त्यावर बंदी घालण्याची मागणीही झाली. या चित्रपटाविरुद्ध अनेकजण न्यायालयातही गेले. मंगळवारी यासंदर्भाती एका याचिकेवर सुनावणी करताना इलाहाबाद उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारलं. तर, संवाद लेखक मनोज मुंतशिर यांना पार्टी बनवून नोटीसही जारी केली.  

रिलीज झाल्यापासून 'आदिपुरुष' वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाच्या निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. वाढता वाद पाहता निर्मात्यांनी चित्रपटाचे संवाद बदलले, थ्रीडी तिकिटांच्या किमतीही कमी केल्या, असे असतानाही 'आदिपुरुष'ला थंड प्रतिसाद मिळतो आहे. आता, दिवसेंदिवस त्याच्या कमाईत मोठी घसरणही होत आहे. याप्रकरणी हायकोर्टात दाखल एका याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी, संवाद लेखकास नोटीसही बजावण्यात आली, तसेच मनोज मुंतशीर यांनी हिंदूंच्या भावनांशी खेळ का केला, याचे उत्तरही न्यायालयाने मागितले आहे. 

हायकोर्ट सोशल एक्टिव्हीस्ट कुलदीप तिवारी आणि वंदना कुमार यांच्यातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये, न्या. राजेश सिंह चौहान आणि न्या. प्रकाश सिंह यांनी कडक शब्दात चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि संवाद लेखकास सुनावले. हिंदू सहिष्णू आहे तर मग तुम्ही त्यांच्या भावनांशी खेळणार का, असा सवालही न्यायालयाने विचारला. जर एखादा चांगला असेल तर त्याला दाबण्याचा प्रयत्न करणार का? असा सवालही हायकोर्टाने विचारला आहे.

चांगली गोष्ट ही आहे की, हा एका अशा धर्माचं प्रकरण आहे, ज्या धर्माचे लोक तोडफोड करत नाहीत. आम्ही बातम्यांमध्ये पाहिलं की काही लोकांनी चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमागृह बंद केले. मात्र, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे कुठलेही काम केले नाही. मग, तुम्ही त्यांच्या सहनशीलतेची परिक्षा घेणार का? असा सवाल हायकोर्टाने विचारला. या चित्रपटातून गंभीर मुद्दे उचलण्यात आले आहेत, असेही न्यायालयाने म्हटले. 

या चित्रपटात असे पात्र आहेत, ज्यांची लोक पूजा करतात. लोक घरातून बाहेर पडण्यापूर्वी रामचरितमानस वाचतात. चित्रपट बनवणाऱ्यांनी राम-सिता आणि हनुमान यांची टिंगल बनवून ठेवलीय. सर्वकाही रामायणातूनच घेतलंय आणि चित्रपटाचे निर्माते म्हणतात की हे रामायण नाही, अशा शब्दात न्यायाधीशांनी निर्मात्यांना आणि संवादलेखकांना खडसावले. तुम्ही देशात राहणाऱ्यांना मूर्ख किंवा वेडा समजता का, असा सवालही न्यायालयाने निर्मात्यांना केला आहे.

 

टॅग्स :AdipurushआदिपुरूषHigh Courtउच्च न्यायालयbollywoodबॉलिवूडcinemaसिनेमा